मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय वारसदार, चिराग नाही.

चिराग पासवान यांनी पासस यांना उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-09T091341.495.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-09T091341.495.jpg

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पशुपती कुमार पारस यांचे पुतणे चिराग पासवान यांनी त्यांना शपथ घेण्यास विरोध केला होता. पारस यांच्याविरोधात चिराग पासवान यांनी पासस यांना उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावरुन पशुपती कुमार पारस यांनी चिराग यांना प्रत्युत्तर दिलं आहे. pashupati kumar paras says i am real political successor ram vilas paswan

पशुपती कुमार पारस म्हणाले की, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय वारसदार आहे. चिराग नाही. राम विलास पासवान यांच्या संपत्तीचे चिराग पासवान हे वारसदार असू शकतात, मात्र खरा राजकीय वारसदार मीच आहे. राम विलास पासवान हे माझे आदर्श आहेत. चिराग पासवान यांनी आपल्या चुकांचे आत्मचिंतन करावे.  

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाची धुरा सांभाळत आहेत. चिराग यांच्याविरोधात पारस यांनी उघड बंड पुकारले होते. लोक जनशक्ती पक्षातील या फुटीमागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हात असल्याची चर्चा सुरू आहे. 
 
मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी  शपथ घेतली. यामध्ये पासवान यांच्याजागी पारस यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. पण चिराग पावसान यांनी त्यावरच आक्षेप घेतला आहे.लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले होते की, पशुपतीकुमार पारस यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्यामुळे आणि पक्ष नेतृत्वाची फसवणूक केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाचाही समावेश करु शकतात. परंतु, आमच्या पक्षाचा विचार करता पारस हे आता सदस्यही नाहीत. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्यास आमच्या याच्याशी संबंध असणार नाही. 

लोकसभा अध्यक्षांनी पारस यांना पक्षाचे संसदीय नेते म्हणून मान्यता दिली आहे. या विरोधात पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचा दाखलाही चिराग पासवान यांनी दिला आहे. आता पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे चिराग हे भाजपपासून आणखी दुरावले जाण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती आजच आली आहे. पासवान यांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.  

मुंबई : ओबीसी आरक्षण OBC Reservation रद्द झाल्यानंतर राज्यातील पाच जिल्हापरिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत Nitin Rautयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना एका पत्राद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाची स्थिती बघून  निवडणुका पुढे ढकलण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाला दिली. त्या पार्श्वभूमीवर डॉ. राऊत यांनी ही मागणी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com