आसाम: विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा विविध घोषणांच्या खिरापती राजकीय नेत्यांकडून वाटल्या जात आहेत. आसाममध्ये सत्तेत आल्यास वादग्रस्त सीएएची (citizenship amendment act) अंमलबजावणी करणार नसून रद्द करू, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता गांधी आसाम दौऱ्यावर असून तेथे त्यांनी ही घोषणा केली.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, भाजपने चहाच्या मळ्यातील कामगारांना दररोज ३६५ रुपये देण्याचे आश्वासन पाळले नसून प्रत्यक्षात मात्र केवळ १६७ रुपयेच दिले जात आहेत. मी नरेंद्र मोदी नसून खोटे बोलणार नाही. आसाममध्ये सत्तेत आल्यास चहा कामगारांना ३६५ रुपये, सीएए रद्द, पाच लाख नोकऱ्या, २०० युनिटपर्यंत मोफत वीज व गृहिणींना दर महिना २ हजार रुपये पगार ही पाच वचने काँग्रेस पूर्ण करेल, असेही गांधी यांनी सांगितले.
भाजपवर आणखी हल्लाबोल चढवताना राहुल गांधी म्हणाले, तरुणांमधील बेरोजगारी, कमी होत असलेली लोकशाही व शेतीविषयक कायदा रद्द न करणे भाजपच्याच काळात झाले आहे. आसामची संस्कृती जपली गेली पाहिजे. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून विविध भाषाही बोलतात. त्या सर्व भाषांचा आदर राखला गेला पाहिजे. सद्यःस्थितीत तसे होताना दिसत नसून विद्यार्थी पंतप्रधानांशी मनमोकळेपणाने बोलू शकत नसतील, तर ही फार मोठी शोकांतिकाच आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.