नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविला! 

'मेक इंन इंडिया', स्टार्टअप इंडिया, इंक्रेडिबल इंडिया यासारख्या संकल्पना राबविण्यात अमिताभ कांत यांचे महत्वाचे योगदान आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-30T130240.194.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-30T130240.194.jpg

नवी दिल्ली :  नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांचा कार्यकाल एक वर्षासाठी केंद्र सरकारने वाढविला आहे. सरकारने तिसऱ्यांदा कांत यांचा कार्यकाळ वाढविला आहे. आता अमिताभ कांत हे जून २०२२ पर्यंत नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहतील. niti aayog ceo amitabh kant gets one year extension

केंद्र सरकारने याबाबत त्यांना पत्र दिले आहे. मंत्रीमंडळाने नियुक्ती केलेल्या समितीने अमिताभ कांत यांचा कार्यकाळ एका वर्षांसाठी वाढविण्यास मंजूरी दिली असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 

१९८०च्या बॅचचे आयएएस अधिकारी अमिताभ कांत यांनी केंद्र सरकारच्या राज्य आणि राष्ट्रीय विविध योजनांच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका बजावली आहे.  'मेक इंन इंडिया', स्टार्टअप इंडिया, इंक्रेडिबल इंडिया यासारख्या संकल्पना राबविण्यात अमिताभ कांत यांचे महत्वाचे योगदान आहे. केरळ कॅडरचे माजी सनदी अधिकारी असलेले  ६५ वर्षीय अमिताभ कांत यांना २०१६ मध्ये दोन वर्षांसाठी नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ जून २०१९ पर्यंत वाढविण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा जून २०२१ पर्यंत त्यांच्या कार्यकाळ वाढविण्यात आला होता. आता पुन्हा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे.  

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभागांची रचना करताना भौगोलिक समानता राखण्यात येणार आहे. निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी प्रभागरचना करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक घटक पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मनसेबाबत अद्याप भाजपची भूमिका तळ्यातमळ्यात आहे. मुंबई महानगरपालिच्या २२७ जागांसाठी भाजपने कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी घेत ८२ जागा पटकावल्या होत्या. या कामगिरीची उजळणी करावयाची झाल्यास भाजपला घटक पक्षांसह मनसेला सोबत घ्यावे लागेल, असे मुंबई भाजपत बोलले जाते. 
 Edited by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com