पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक करू नका; शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा

एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक मोदी सरकारनं करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला केले.
NCP President Slams Modi Government over farmers protest in delhi
NCP President Slams Modi Government over farmers protest in delhi

मुंबई : मागील 60 दिवस शेतकऱ्यांनी अत्यंत शांततेत आंदोलन केलं. त्यांनी संयमानं भूमिका घेऊनही केंद्र सरकार आपला भूमिका बदलायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढायचा निर्णय घेतला. याबाबतही केंद्रानं समंजसपणा दाखवायला हवा होता. आतातरी शहाणपणा दाखवून टोकाची भूमिका सोडावी. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक मोदी सरकारनं करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला केले.

शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण मिळाल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी संबोधण्यात आले. असा आततायीपणा करण्यात आला. शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मीही अनेक मोर्चे पाहिले आहेत. पण फक्त शेतकऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहत आहे. मागील 60 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी दाखविलेला संयम अभूतपूर्व आहे. ते इतका संयम दाखवत असताना केंद्रानेही संयमाची भूमिका घ्यायला हवी होती. 

केंद्राने भूमिका न बदलल्याने शेतकऱ्यांना मोर्चा काढावा लागला. इतके दिवस संयमाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल केंद्राने समंजपणा दाखवायला हवा होता. पण आंदोलनाला येण्या-जाण्याबाबत जाचक अटी लादलण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटल्याने आंदोलन चिघळलं. पण हे का घडले याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबईत सोमवारी झालेल्या मोर्चादरम्यानची स्थिती राज्य सरकारने संयमाने हाताळली. केंद्र सरकारनेही असाच संयम दाखवायला हवा होता, असे पवार म्हणाले. दिल्लीत 25 हजार ट्रॅक्टर आल्यावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार केंद्राने करायला हवा होता, असे सांगत पवार यांनी या मोर्चामध्ये समाजविघातक शक्ती घुसल्याच्या शक्यतेचा इन्कार केला. केंद्राने शहाणपणा दाखवून हा प्रश्न मार्गी लावायला हवा. अस्वस्थ झालेला पंजाब आता सावरला आहे. त्याला पुन्हा अस्थिर करण्याचा पातक सरकारने करू नये, असे आवाहन पवार यांनी केले.

दरम्यान,  पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याचदरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकल्याचे आढळून आले. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर काही शेतकऱ्यांनी पोलिसांना दोषी धरत त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. 

दिल्लीत काही भागात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याचदरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकल्याचे आढळून आले. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर काही शेतकऱ्यांनी पोलिसांना दोषी धरत त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com