तीस वर्षात एकदाही भाजपच्या बाजूने बोललो नाही, तरीही आरोप कसा ? सिब्बलांचा राहुल गांधींना सवाल

गुलाम नबी आझाद तर प्रचंड नाराज झाले असून आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे.
तीस वर्षात एकदाही भाजपच्या बाजूने बोललो नाही, तरीही आरोप कसा ? सिब्बलांचा राहुल गांधींना सवाल

नवी दिल्ली : " गेल्या तीस वर्षात कोणत्याही मुद्यावर मी एकदाही भाजपच्या बाजूने बोललो नाही. आजपर्यंत कॉंग्रेस जेव्हा जेव्हा अडचणीत आली किंवा एखाद्या राज्यातील कॉंग्रेस सरकार संकटात सापडले तेव्हा मी खंबीरपणे पक्षाच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे भाजपशी आम्ही कसे काय संगनमत करू शकतो असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

दरम्यान, राहुल गांधींनी त्या पत्राबाबत टीका केली आहे. त्यांनी भाजपच्या संगनमताबाबत जो आरोप केला जात आहे. तो सिद्ध झाल्यास ती क्षणाचीही वाट न पाहता राजीनामा देईन असे दुसरे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी म्हटले आहे. 

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात उपचार घेत असताना पक्षाच्या नेतृत्वावरून पत्र का पाठविले असा सवाल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आजच्या बैठकीत केल्यानंतर पक्षातील वाद उफाळून आला आहे. राहुल यांच्या विधानावर सिब्बल, आझाद यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सिब्बल यांनी तातडीने ट्विट करीत राहुल गांधींना जशास तसे उत्तर दिले आहे. सिब्बल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "" गेल्या तीस वर्षात कोणत्याही मुद्यावर भाजपच्या बाजूने कधीही निवेदन दिलेले नाही. राजस्थानात कॉंग्रेस अडचणीत असताना मी पक्षाचा बचाव केला. मणिपूरमध्ये भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मी पक्षासाठी न्यायालयात उभा राहिलो. कॉंग्रेस जेव्हा जेव्हा संकटात आली तेव्हा तेव्हा आम्ही खंबीरपणे उभे राहिलो तरीही आम्ही भाजपशी संगनमत केले असे कसे म्हणता येईल असा सवालही सिब्बल यांनी केला आहे. 

गुलाम नबी आझाद तर प्रचंड नाराज झाले असून आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. 

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना अजूनही वाटते सोनिया गांधींनीच पक्षाचे नेतृत्व करावे तर काही नेत्यांना वाटते की पुन्हा राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार विरोधात लढायचे असेल सक्षम विरोधीपक्ष असायला हवा अशी भूमिका पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी घेतली आहे. त्यांनाही असे वाटते की सोनिया यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे. 

ज्यांनी पक्षाच्या नेतृत्वावरून पत्र लिहिले त्या पत्राची आज कॉंग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. ज्यांनी हे पत्र लिहिले होते त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. काही नेत्यांनी तर पत्र लिहिणाऱ्यांच्या विरोधात मोहीमच सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे खुद्द सोनिया यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

जर त्यांनी अध्यक्षपदावर न राहण्याचा निर्णय घेतला तर पुढचा अध्यक्ष कोण याचीही उत्सुकता देशभर आहे. सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की मला अध्यक्षपावरून मुक्त करा. आजची कॉंग्रेसची दिल्लीतील बैठक वादळी ठरली असून भाजपने कॉंग्रेसवर टीका केली आहे. 

प्रियांका गांधी यांनी काही दिवसापूर्वी म्हटले आहे, की आमच्या घराण्यातील कोणीही आता कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही. तसे झाले तर कॉंग्रेसचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्‍न आहे. पण, कॉंग्रेसला जीवंत ठेवायचे असेल तर गांधी घराण्यातील व्यक्तीच अध्यक्ष हवी अशी भूमिकाही काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com