एकदा म्हणता उत्सव, नंतर म्हणता दुसरे युद्ध…नेमके काय?  

मोदींनी लॉकडाउन जाहीर करताना २१ दिवसांत युद्ध जिंकू अशी घोषणा केली होती.
P. Chidambaram, Narendra Modi .jpg
P. Chidambaram, Narendra Modi .jpg

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ११ ते १४ एप्रिलदरम्यान कोरोना लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. देशात अनेक राज्य लसींचा साठा कमी असल्याची तक्रार करत आहेत. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींनी उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्याने टीका होत आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी रविवारी उत्सव ही दुसरी लढाई असल्याचा उल्लेख केला. यावरुन काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी टोला लगावला आहे.

पी चिदंबरम यांनी ट्विट करत लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्द असा सवाल केला आहे.  यावेळी ते म्हणाले की ''मोदींनी लॉकडाउन जाहीर करताना २१ दिवसांत युद्ध जिंकू अशी घोषणा केली होती'', त्याचीही आठवण करुन दिली.

''एकदा सरकार म्हणते की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणते…दुसरे युद्ध आहे. नेमके काय आहे?''. ''पंतप्रधानांनी पहिला लॉकडाउन जाहीर केला तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे १८ दिवसांत जिंकले होते. त्याचे काय झाले?'' असे पी चिदंबरम म्हणाले आहेत. ''पोकळ अभिमान, वकृत्व आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या वाटपामधील आपले मोठे अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे,'' असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान काय म्हणाले 

देशात कोरोनाप्रतिबंधासाठी ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान लसीकरण उत्सव आयोजित करण्यात आला असून ती लसीकरणाच्या विरोधातील दुसरी लढाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांना रविवारी अनेक सूचना केल्या. व्यक्तिगत सुरक्षा व सामाजिक आरोग्य यावर भर देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थांच्या आरोग्याला धोका असल्याने मेडिकलच्या सर्व परिक्षा पुढे ढकला...

''लोकांनी चार गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्यात, प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, प्रत्येक रुग्णावर उपचार व्हावेत, प्रत्येकाने कुणाला तरी मदत करावी. वयस्कर लोकांना आणि जे लोक जास्त शिकलेले नाहीत त्यांना लस घेण्यास मदत करा. मास्क परिधान करून स्वत:चे व इतरांचे जीव वाचवा. सोसायटीच्या सदस्यांनी सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रे तयार करावीत. जेथे कुणी रुग्ण संसर्गित असेल तेथेच असे करावे. 

बाकी ठिकाणी नाही. त्यातून कोरोनाशी लढा देणे सोपे जाईल कारण आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्राबाबत जागरूकता राखण्याची गरज आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका. जे लशीसाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी. मास्क, साबणाने हात धुणे हे नियम पाळावेत''.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com