विधानसभेतील तांडव; तेजस्वी यादवांना महागात पडणार

विशेष सशस्त्र पोलिस विधेयकावरून काल बिहार विधानसभेत जोरदार राडा झाला.
 Tejaswi Yadav, Chief Minister Nitish Kumar .jpg
Tejaswi Yadav, Chief Minister Nitish Kumar .jpg

पटणा : विशेष सशस्त्र पोलिस विधेयकावरून काल बिहार विधानसभेत जोरदार राडा झाला. राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी घातलेला गोंधळ आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सरकारने कठोर भूमिका घेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशेष सशस्त्र पोलिस या विधेयकाला विरोध करणारे आमदार व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धक्काबुक्की झाली. यावरून बिहारमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. यानंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी हे कृत्य केले असल्याचे म्हटले आहे. 

या विधेयकाला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने सुरूवातीपासूनच विरोध केला होता. हे विधेयक मंजुरीसाठी सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विधेयक मंजुरीआधी विरोधी आमदार थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहचले. त्यांच्या हातातून विधेयक ओढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेजस्वी यादव यांनी हे विधेयक फाडल्याने सत्ताधारी आमदारांनीही विरोध करण्यास सुरूवात केली. यानंतर पोलिस आणि आमदारांमध्ये जोरदार राडा झाला.  

दरम्यान, आमदारांना करण्यात आलेल्या मारहानीवरुन तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला. तसेच नितीश कुमार यांनी माफी न मागितल्यास आम्ही उर्वरीत अधिवेशन काळासाठी सभागृह त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यादव म्हणाले, आमच्या महिला आमदारांचे केस अोढण्यात आले. आमच्या आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी हे कृत्य केले असून आम्ही जेव्हा सभागृहात असतो तेव्हा मुख्यमंत्री सभागृहाबाहेर असतात. राजदच्या आमदारांना लोकशाही मंदिरातच मारहाण झाल्याचे यादव म्हणाले. गुंड वृत्तीच्या सरकारच्या गुंडांनी आमदारांना स्ट्रेचरवर जाव लागेल, एवढे बेदम मारले, रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेले, असेही यादव यांनी सांगितले. 

काय आहे विधेयक?

बिहारमध्ये अजूनही बिहार मिलिटरी पोलीस नावाचे दल आहे. मिलिटरी हा शब्द कोणत्याही राज्याच्या पोलीस दलाला नसते. मिलिटरी हा शब्द हटविणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. विशेष सशस्त्र पोलिसांचे काम सरकारी संस्थांमधील सुरक्षा करणे हे असल्याचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी सांगितले. पण या दलाकडे कोणचीही तपासणी करण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार नाही. या विधेयकामुळे हे अधिकार मिळणार आहेत. तर या अधिकारांमुळे पोलिस कुणाचीही घरात थेट घुसून तपासणी करतील, अटक करतील असा आरोप विरोधकांनी केला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com