देशात डिजिटल क्रांती आणण्याचे श्रेय राजीव गांधींच्या दूरदृष्टीलाच.

देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय स्वर्गीय राजीव गांधींना आहे,
1Rajiv_20Gandhi_3.jpg
1Rajiv_20Gandhi_3.jpg

मुंबई :  माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही स्वर्गीय राजीवजींच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय स्वर्गीय राजीवजींना Rajiv Gandhiआहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. 30th death anniversary of former Prime Minister Rajiv Gandhi


 ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा : अजित पवार  
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या विकासाचे धोरण राबवले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. कोरोना संकटात आज अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संपर्क, संवाद साधत आहेत. ज्या डिजिटल क्रांतीमुळे हे शक्य झाले ती डिजीटल क्रांती राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित रहावी, सर्वधर्मसमभाव कायम रहावा, यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. राजीवजींचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असे  आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 
कार्यकर्ते आणि युवकांना प्रोत्साहन धोरण : संजय बालगुडे  

राजीव गांधी काँग्रेस भवनमध्ये आले होते, त्यावेळी त्यांचे मी स्वागत केले. युवक काँग्रेसने सुरू केलेल्या पहिल्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन त्यांनी केले. देशाचा पंतप्रधान रुग्णवाहिकेचे उद्घाटन करतो, याबाबत थोडे आश्चर्यच व्यक्त केले गेले होते. पण कार्यकर्ते आणि युवकांना प्रोत्साहन हे त्यांचे धोरण होते, अशी आठवण लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी सांगितली. डिसेंबर १९८४मध्ये राजीव गांधी पुण्यात प्रचारासाठी आले होते. बॅ. गाडगीळ, शंकरराव पाटील आणि रामकृष्ण मोरे यांच्यासाठी त्यांची प्रचारसभा होती. त्यांची एवढी लोकप्रियता होती की, काँग्रेसने सभेसाठी पास छापले होते. त्यांना जवळून पाहता यावे, म्हणून मी महाविद्यालयीन युवक असताना पास मिळवून सभेला गेलो होतो. त्यावेळी शेवटच्या वर्षांत शिकत होतो. एवढी मोठी सभा त्यानंतर पुण्यात पाहिलेली नाही. ते काँग्रेस भवनमध्ये आले होते, त्यावेळी त्यांचे मी स्वागत केले. युवक काँग्रेसने सुरू केलेल्या पहिल्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन त्यांनी केले. देशाचा पंतप्रधान रुग्णवाहिकेचे उद्घाटन करतो, याबाबत थोडे आश्चर्यच व्यक्त केले गेले होते. पण कार्यकर्ते आणि युवकांना प्रोत्साहन हे त्यांचे धोरण होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com