व्यंकय्या नायडू म्हणतात, "" तुळजा भवानी माता, शिवरायांचा अनादर करण्याचा प्रश्‍नच येत नाही !'' 

नायडू भाजपचे ज्येष्ठ नेते होते. आज ते राष्ट्रपती असले तरी त्यांनी आतापर्यंत विविध मंत्रीपदावर काम केले आहे.
व्यंकय्या नायडू म्हणतात, "" तुळजा भवानी माता, शिवरायांचा अनादर करण्याचा प्रश्‍नच येत नाही !'' 

नवी दिल्ली : तुळजा भवानीमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपणास आदरच असून त्यांचे आपण उपासक आहोत. शपथ घेताना कोणत्याही पारंपरिक घोषणा दिल्या जात नाही याची फक्त आठवण राज्यसभा सदस्यांना करून दिली. त्यामुळे तुळजा भवानी किंवा शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणताही अनादर करायचा प्रश्‍नच येत नाही असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. 

छत्रपती उदयनराजे यांना "जय भवानी, जय शिवाजी' घोषणा देण्यावरून समज दिली असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिवप्रेमींसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. नायडू यांना तर "जय भवानी, जय शिवाजी' असा उल्लेख असलेली वीस लाख पत्रे पाठविण्याची घोषणाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी केली होती.

तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नायडू यांची बाजू घेत नायडू चुकीचे वागले नाहीत असे म्हटले होते. मात्र त्यानीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 
आज दिवसभर महाराष्ट्रात या मुद्यावरून राजकीय धुरळा उडाला. मात्र नायडू यांनी ट्विट करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

नायडू भाजपचे ज्येष्ठ नेते होते. आज ते राष्ट्रपती असले तरी त्यांनी आतापर्यंत विविध मंत्रीपदावर काम केले आहे. महाराष्ट्राशीही त्यांचे नाते आहे. ते एकेकाळी भाजपचे राज्याचे प्रभारी होते. त्यामुळे तुळजा भवानी माता आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांना आदर आहे. शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर त्यांच्या यापूर्वीच्या भाषणातून दिसून आला आहे. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

व्यंकय्या नायडू यांनी काहीवेळापूर्वी ट्‌विट केले आहे. या ट्‌विटमध्ये ते म्हणतात, "" तुळजा भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मी उपासक आहे. त्यांच्याविषयी अनादर बाळगण्याचा प्रश्‍नच येत नाही. फक्त सदस्यांना येथे पारंपारिक घोषणा दिल्या जात नाहीत याची आठवण करून दिली. त्यामुळे अनादर करण्याचा प्रश्‍नच येत नाही.'' 

राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली. याआधी राऊत यांनी ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचं प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे अशी टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com