राहुल गांधी हे पळपुटे : रविशंकर प्रसाद

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चुकीची माहिती पसरवून देशाची फसवणूक करण्यासोबतसंधीसाधू राजकारण करीत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्रीरविशंकर प्रसाद यांनी केली आहे.
ravishankar prasad targets rahul gandhi
ravishankar prasad targets rahul gandhi

नवी दिल्ली : महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कोरोनाचे  देशात सर्वांत जास्त रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे मात्र, अशा वेळी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी राहुल गांधी त्यापासून पळ काढत आहेत, असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला. 

कोरोना संकटाच्या काळात राहुल गांधी यांच्याकडून सतत खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यात आली आहेत, असे सांगून प्रसाद यांनी म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेस सहभागी असताना राहुल गांधी म्हणतात, की आमचा राज्यात निर्णय प्रक्रियेत काही सहभाग नाही. असे सत्ता समीकरण विचित्रच म्हणायला हवे. याचाच अर्थ ते महाराष्ट्र सरकारच्या अपयशापासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करूत आहेत. 

लॉकडाउन अपयशी ठरले ,असा आरोप आरोप राहुल गांधी करतात तेव्हा त्यांनी सर्वप्रथम लॉकडाउन करणाऱ्यांमध्ये पंजाब आणि राजस्थान ही काँग्रेसशासित राज्ये होती, याचा विसर पडतो. याचाच सरळ अर्थ अस होतो की, काँग्रेसची सत्ता असणारी राज्येही राहुल गांधींचे ऐकत नाहीत. यामुळे त्यांनी मोदी सरकारला सल्ला देण्यापेक्षा आधी काँग्रेसशासित राज्यांमधील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घ्यावा. स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर ते केवळ राजकारण करत आहेत, अशा आरोप त्यांनी केला. 

नवी दिल्ली : लॉकडाउनमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. सरकार याबाबत पावले उचलत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी बुधवारी दाखल केली. सुरजेवाला यांनी याचिकेत म्हटले आहे की, स्थलांतरित कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत. विशेषतः लॉकडाउनमुळे मूळ राज्यात परत जाऊ न शकणाऱ्या कामगारांसाठी सरकारला पावले उचलण्यास सांगावे. स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नी विरोधी पक्षांचा समावेश असलेली संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे सरकार विरोधी पक्षांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाकडून उद्या (ता.28) सोशल मीडियावर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही मोहिम चालविण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी दिली. लॉकडाउनमुळे हाल सुरू असलेल्या नागरिकांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माकन म्हणाले की, पक्षाचे  नेते आणि कार्यकर्ते उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत 'स्पीकअप' ही ऑनलाइन मोहीम सोशल मीडियावर चालवतील. देशभरात अडलेल्या सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोचविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. याचबरोबर मनरेगा अंतर्गत त्यांनी 200 दिवसांचा रोजगार देण्यात यावा आणि त्यांनी तातडीने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. तसेच, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com