सुशांतच्या जिवाला धोका असल्याचे सांगूनही मुंबई पोलिसांनी काहीच केले नाही...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले होते. आता या प्रकरणाच्या तपासावरून मोठा गदारोळ उडाला आहे. या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
sushant singh rajputs father claims mumbai police didnt take action on his complaint
sushant singh rajputs father claims mumbai police didnt take action on his complaint

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. आता सुशांतच्या वडिलांनी या प्रकरणी आणखी एक गौप्यस्फोट केला असून, सुशांतच्या मृत्यूस मुंबई पोलिसांना जबाबदार धरले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

सुशांतचे पिता के.के.सिंह यांनी एक व्हिडीओ संदेश जाहीर केला आहे. यात त्यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. सुशांतच्या मृत्यूला मुंबई पोलीस जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या जिवाला धोका असल्याचे मी वांद्रे पोलिसांनी 25 फेब्रुवारीला कळविले होते. त्याचा मृत्यू 14 जूनला झाला. यानंतर मी 25 फेब्रुवारीला केलेल्या तक्रारीत उल्लेख असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी मी केली होती. सुशांतच्या मृत्यूला 40 दिवस उलटूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे मी अखेर पाटण्यात एफआयआर दाखल केला. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com