उत्तर प्रदेश गुन्हेगारीमध्ये देशात टॉपर; योगीजी तुम्ही काय करताय?

कानपूरमधील चकमकीनंतर उत्तर प्रदेशमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा समोर आली आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे.
priyanka gandhi targets yogi adityanath over rising crime in uttar pradesh
priyanka gandhi targets yogi adityanath over rising crime in uttar pradesh

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढला असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कानपूरमधील चकमकीत आठ पोलीस मारले गेल्यानंतर तर राज्य सरकारला तोंड दाखविण्यासही जागा राहिलेली नाही. आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याच मुद्द्यावरु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. 

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रियांका गांधी यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मागील आठवडाभरात उत्तर प्रदेशात सुमारे 50 हत्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री सगळीकडे राज्य गुन्हेमुक्त झाल्याचा प्रचार करीत आहेत. मात्र, सत्य वेगळेच आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश अनेक गुन्ह्यांमध्ये देशात आघाडीवर आहे. आज पुन्हा जौनपूर येथे हत्येचा एक नृशंस प्रकार समोर आला आहे. आता बस झाले. याची जबाबदारी कोण घेणार? 

गॅगस्टर विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना 2 जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले असून, विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल 60 गुन्हे दाखल आहेत. 

विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या हत्येमुळे तो उत्तर प्रदेशसह राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. त्याने 2000 मध्ये कानपूरमधील ताराचंद इंटर कॉलेजच्या सहाय्यक व्यवस्थापकाचा खून केला होता. त्याचवर्षी कानपूर कारागृहात असतानाच त्याने रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट आखला होता. नंतर 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे खून प्रकरणातही त्याचा समावेश होता. दुबेने 2018 मध्ये त्याच्या चुलतभावावरच खुनी हल्ला करवून आणला होता. 

विकास दुबेने 2002 मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या होत्या. त्यामुळे कानपूर शहरासह बिलहार, शिवराजपूर, रिनयान आणि चौबेपूर या भागात त्याची दहशत आहे. काल झालेली चकमक ही चौबेपूर भागातच झाली होती. येथेच दुबे आणि त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांना ठार केले. दुबे याचे अनेक राजकीय पक्षांशी जवळचे संबंध आहेत. शिवराजपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत कारागृहातून निवडून येण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंद आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com