१ फेब्रुवारीचा मोर्चा शेतकरी संघटनांनी केला रद्द

येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्या दिवशी संसदेवर मोर्चा काढण्याचा आपला निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला असून त्या ऐवजी ३१ जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथीच्या दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Parliament Building
Parliament Building

नवी दिल्ली : येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्या दिवशी संसदेवर मोर्चा काढण्याचा आपला निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला असून त्या ऐवजी ३१ जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथीच्या दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी शेतकरी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅली काढली. त्यानंतर शेतकऱ्यांचा एक गट लाल किल्ल्यात घुसला व तिथे हिंसाचार झाला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या शेतकऱ्यांना भडकवणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. तर भाजपने हा आरोप नाकारला आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावरुन आता शेतकरी संघटनांमध्येही दोन गट पडत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण ट्रॅक्टर परेडच्या दरम्यान हिंसाचार घडवून आणण्याचा केंद्र सरकारचा कट होता असा आरोप पंजाबचे शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी केला आहे. राजेवाल यांचेही नांव पोलिसांच्या फिर्यादीत आहे. किसान मजदूर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना हिंसाचार करता यावा, यासाठी दिल्ली पोलिसांनीच अडथळे दूर केल्याचा आरोप राजेवाल यांनी केला आहे. पंजाबी अभिनेता दीप सिद्धू हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित असून त्यानेच शेतकऱ्यांना हिंसाचार करण्यासाठी भडकावले, असाही आरोप राजेवाल यांनी केला आहे. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्याने या आंदोलनावर टीका होऊ लागली आहे. याच दरम्यान भाजपने तिरंगा रॅलीची घोषणा केली आहे.  भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीमध्ये विशेष तिरंगा रॅली काढण्याची घोषणा केली आहे. आपल्या ट्विविटर अकाऊंटवरुन त्यांनी याबाबत ट्विविट केलं आहे. ' तिरंग्याचा अपमान आता सहन केला जाणार नाही. पोलिसांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. ही तिरंगा रॅली ३० जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. सेंट्रल पार्क कॅनॉट प्लेसपासून ही रॅली सुरु होईल. तुम्ही सुद्धा तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये नक्की सहभागी व्हा' असं कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com