शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप

शेतकरी संघटनांनी विश्‍वासघात केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी ‘कोणाही दोषीला सोडणार नाही’ असा इशारा दिला. प्रजासत्ताकदिनी झालेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागल्याबद्दल त्यांनी शेतकरी नेत्यांवर आरोप केले.
Delhi Tractor Rally
Delhi Tractor Rally

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी विश्‍वासघात केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी  ‘कोणाही दोषीला सोडणार नाही’ असा इशारा दिला. प्रजासत्ताकदिनी झालेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागल्याबद्दल त्यांनी शेतकरी नेत्यांवर आरोप केले.

दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी काल पत्रकार परिषदेत घेतली. त्यांनी सांगितले की, ट्रॅक्टर मोर्चाबाबत शेतकरी संघटनांबरोबर सविस्तर आधी चर्चा झाली होती. या चर्चेवेळी काही अटी ठरल्या होत्या आणि त्या शेतकऱ्यांनी मान्य केल्यानंतरच मोर्चाला परवानगी देण्यात आली होती. ट्रॅक्टर मोर्चा दुपारी बारा ते संध्याकाळी पाच या दरम्यान निघणे अपेक्षित असताना तो बराच आधी सुरु करण्यात आला. तसेच, केवळ पाच हजार ट्रॅक्टरना परवानगी देण्यात आली होती, प्रत्यक्षात त्याहून कितीतरी अधिक पटींनी ट्रॅक्टर सहभागी झाले होते. शस्त्र आणण्याची परवानगी नसतानाही ती आणली गेली, असा दावा श्रीवास्तव यांनी केला. 

या अटींचा भंग करून शेतकरी नेत्यांनी विश्‍वासघात केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यांना रोखताना ३९४ पोलिस कर्मचारी जखमी झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविताना प्रचंड संयम दाखविल्याने एकाचाही बळी गेला नाही. या प्रकरणी आतापर्यंत २५ एफआयआरची नोंद झाली असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान गोंधळ घालणाऱ्यांना पकडण्यासाठी चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून सीसीटीव्ही आणि व्हिडिओंचाही वापर केला जात असल्याचे आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले. यातून ओळखल्या जाणाऱ्यांना आणि दोषींना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

चिथावणीखोर भाषणे

सतनामसिंग पन्नू आणि दर्शनपाल यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे केल्यानेच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप आयुक्त श्रीवास्तव यांनी केला. शेतकरी नेते दिलेला शब्द पाळणार नाहीत, याचा अंदाज २५ जानेवारीच्या संध्याकाळीच आला होता. त्यांनी आक्रमक आणि बंडखोर घटकांना पुढे आणत चिथावणीखोर भाषणे दिली, असे ते म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com