अधिवेशनाआधी काँग्रेस घेणार विरोधकांची बैठक

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारल्यानंतर विरोधी पक्षांनी आता मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली तसेच संसदेतील रणनितीसाठी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांना बैठकीचे निमंत्रणही काँग्रेसने दिले.
Sonia GAndhi
Sonia GAndhi

नवी दिल्ली : कृषी कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारल्यानंतर आता विरोधी पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. केंद्राने कृषी कायदे तातडीने रद्द करावे आणि पंतप्रधान मोदींनी आता शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. तसेच या कायद्यांबाबत संसदेमध्ये विरोधकांची रणनिती ठरविण्यासाठी काँग्रेसतर्फे संसद अधिवेशनाआधी विरोधी पक्षांची बैठक घेतली जाणार आहे.

कृषी कायद्यांवरील महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सरकारवर ताशेरे ओढले. शेतकरी आणि सरकारमध्ये वाटाघाटी सुरू असल्याने त्यावर परिणाम होईल अशी टिप्पणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने टाळले. मात्र, कृषी कायद्यांना स्थगिती देण्याच्या शक्यतेवरही भाष्य केले.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारल्यानंतर विरोधी पक्षांनी आता मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी  विरोधी पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली तसेच संसदेतील रणनितीसाठी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांना बैठकीचे निमंत्रणही काँग्रेसने दिले.

दुसरीकडे, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवरून मोदी सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हित जपण्यास अपयशी ठरल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहेत. किमानत आता तरी सरकारला सुबुद्धी सुचेल. केंद्र सरकारने तातडीने कृषी कायदे रद्द करावे आणि पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी वेणुगोपाल यांनी केली.

तर, काँग्रेस सरचिटणीस आणि मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, सरकारला कृषी कायदे रद्द करावेच लागतील असा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालय राजकीय बेईमानीतून भांडवलदारांच्या दरवाजावर शेती विकण्याच्या षडयंत्रावर नव्हे तर राजकीय मुद्द्यांवर निर्णय करते आहे. मुख्य मुद्दा तीन कृषी विरोधी कायद्यांमध्ये एमएसपी आणि बाजार समित्या संपविण्चा आहे आणि शेतकऱ्याला आपल्याच शेतामध्ये गुलाम बनविण्याचा आहे. त्यामुळे सरकारला हे कायदे रद्द करावे लागतील, असे ट्विट सुरजेवाला यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com