चिदंबरम म्हणतात, राजस्थानमध्ये आता थेट राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा

राजस्थानामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला होता. या प्रकरणी राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
congess leader p chidambaram demands president intervention in rajasthan
congess leader p chidambaram demands president intervention in rajasthan

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक १८ आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली होती. यावरुन राजस्थानातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोचला होता. या प्रकरणी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी राष्ट्रपतींनाच साकडे घातले आहे. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन उचलबांगडी केली आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका अखेर मागे घेतली आहे. 

ज्येष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री पी. चिदंबरम यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला. भाजप सरकारने नियुक्त केलेले राज्यपाल घटनात्मक चौकटीचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी म्हटले आहे की, सध्या घडत असलेल्या गोष्टींची दखल राष्ट्रपती घेत असतील, अशी आशा मला आहे. संसदीय लोकशाही, राज्यघटना यांचा भंग होत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींनी योग्य पाऊल उचलायला हवे. अन्यथा संसदीय लोकशाही प्रक्रियेला मोठा धक्का बसेल. 

राजस्थानच्या राज्यपालांना ते कुठे चुकत आहेत, हे सांगण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. भारताचे राष्ट्रपती राज्यपालांना विधानसभा अधिवेशन बोलावण्यासाठी निर्देश देऊ शकतात, असा मला विश्वास आहे. राज्यापालांनी आता योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन काम करण्याची गरज आहे. राज्यपालांना अशा प्रकरणांमध्ये स्वत:चे मत नसते, चिदंबरम यांनी नमूद केले. 

सचिन पायलट आणि बंडखोरांमुळे राजस्थानातील कॉंग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. मागील काही दिवसांपासून या राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. कॉंग्रेसची मोठी फौजच गेहलोत सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी पुढे आली आहे. पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत आक्रमक झाले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये कोणताही संवादच नव्हता, असा खुलासाही खुद्द गेहलोतांनीच केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com