राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मिळाले अन् इकबाल अन्सारी म्हणाले, ही तर रामाचीच इच्छा!

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण या प्रकरणी न्यायालयीन लढ्यात सहभागीअसलेल्यांपैकीइकबाल अन्सारी यांना देण्यात आले आहे.
ayodhya case litigant iqbal ansari invited to ram mandir bhoomi pujan ceremony
ayodhya case litigant iqbal ansari invited to ram mandir bhoomi pujan ceremony

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  ५ ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत लगबग सुरू झाली असून, याचे निमंत्रण इकबाल अन्सारी यांना देण्यात आले आहे. अयोध्येतील जागेबाबत न्यायालयीन लढ्यात सहभागी असणाऱ्यांपैकी ते एक आहेत.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

अडवानी आणि जोशी यांनाच राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमातून डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. याचबरोबर भाजपमध्येही याबद्दल नाराजीचा सूर होता. अखेर अडवानी आणि जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. अडवानी आणि जोशी यांची अशा प्रकारे व्हर्च्युअल उपस्थिती कार्यक्रमाला असेल. 

या कार्यक्रमाचे निमंत्रण इकबाल अन्सारी यांना मिळाले आहे. या भगव्या रंगाच्या निमंत्रणपत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नावे आहेत. अन्सारी यांचे पिता बाबरी मशिद-रामजन्मभूमी जमीन वादातील सर्वांत जुने याचिकाकर्ते होते. त्यांचे 2016 मध्ये निधन झाले. त्यानंतर इकबाल यांनी हा खटला पुढे सुरू ठेवला होता. यावर त्यांनी मला निमंत्रण मिळावे ही तर रामाचीच इच्छा होती, अशी भावना व्यक्त केली आहे. 

त्यांनी म्हटले आहे की, मला निमंत्रण मिळाले असून, ही तर भगवान रामाचीच इच्छा होती, असे मला वाटते. अयोध्येतील हिंदू आणि मुस्लिम सलोख्याचे प्रतिक म्हणून मी हे निमंत्रण स्वीकारत आहे. मंदिर बांधून झाल्यानंतर अयोध्यावासियांचे नशीब पालटेल. अयोध्या ही आणखी सुंदर बनेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com