परभणीमध्ये तीन दिवस संचारबंदी...

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शहरात कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
0curfew_1
0curfew_1

परभणी : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात गुरुवारीपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी अत्यंत कडक पध्दतीने केली जात आहे. सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह शहरातील तीनही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी शहरात कर्तव्यावर हजर आहेत. परभणी शहरात गुरुवारी कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळले आहेत.

या आधी सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात व विशेषत: परभणी शहरात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यातील ९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ते आपआपल्या घरी परतले आहेत. परंतू अचानक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शहरात कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.


राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूमुखी पडणाऱ्या रूग्णांची संख्यादेखील वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक शहरातील व्यवहार बऱ्यापैकी सुरळित झाला आहे. गेल्या महिनाभरात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णसंख्येबरोबरच मृत्यूदरातही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात असलेला ३.८१ मृत्यूदर या महिन्याच्या सुरवातीला ४.३८ वर पोचला आहे.

तपासण्यांची संख्या वाढल्याने मृत्यूदरात काहीशी वाढ झाल्याचे राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील आधिकारी सांगत आहेत. मात्र, तपासण्यात वाढ केल्याने या काळात अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे आधिकारी सांगत आहेत. पुण्यासह राज्यात तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. राज्यात सध्या ११० लॅबमध्ये कोरोनाची तपासणी होत आहे. यामध्ये खासगी व सरकारी लॅबचा समावेश आहे. 

तपासण्या वाढवा मृत्यूदर कमी होईल, असे सूत्र सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या महिनाभरात तपासण्या वाढविल्यानंतर मृत्यूदरातही वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागातील तज्ञांच्या मतानुसार झालेली वाढ केवळ ०.५७ इतकी आहे. वाढविण्यात आलेल्या चाचण्यांच्या तुलनेत वाढ फारशी झालेली नाही. उलट चाचण्यांची संख्या वाढवल्याने महिनाभरात आपण अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवू शकलो आहे.चाचण्यांची संख्या वाढली नाही तर प्राथमिक अवस्थेत रूग्ण सापडण्याचे प्रमाणदेखील कमी होते.

अत्यवस्थ झाल्यानंतर तर रूग्ण रूग्णालयात दाखल झाला तर मृत्यू होण्याची शक्यता असते. यातूनच मृत्यूदर वाढतो. येत्या काळात लॅबची संख्या वाढविण्याबरोबरच तपासण्यांची संख्या राज्यभरात आणखी वाढविण्यात येणार असल्याचे या यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. राज्याच्या इतर शहरांचा विचार केला तर तुलनेने पुणे व मुंबईत रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यानंतर जळगाव व सोलापूर शहरात मृत्यूदर अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुण्यात व्यवहार सुरळित झाले. मात्र, शहराच्या जवळपास सर्वच भागात आता रूग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या वाढली आहे.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com