विमा कंपन्या मुजोर तर सरकार कमजोर ; भाजपचा घणाघात

विमा कंपनी आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
Sarkarnama - 2021-09-18T101734.580.jpg
Sarkarnama - 2021-09-18T101734.580.jpg

लातूर  : गेल्या काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता यावर जिल्हाधिकारी यांनी 25 % पीकविमा द्यावा, असे आदेश दिले असताना देखील विमा कंपन्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलत असल्याने याविरोधात उच्च न्यायालयात (High Court)औसा येथील आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी धाव घेतली आहे. या प्रकरणात विमा कंपनी (Insurance Companies) आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.   

राज्यासह लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जाव लागलं कोणाचे पीक पाण्यात गेले तर ऊस आणि अन्य पीक आडवा झाला दरवर्षी निसर्गाच्या संकटामुळे शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा भरत आहेत. लातूर हे राज्यात सोयाबीनचे कोठार अशी ओळख असल्याने जिल्ह्यातील 6 लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी किमान 4 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली आहे. आता या पावसाने अपेक्षित असलेल्या उत्पन्नाच्या 50 %  सोयाबीन पीकाचे नुकसान झाले आहे.

CID : परमबीर सिंह नक्की आहेत तरी कुठे?  
नियमानुसार लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी शेतकऱ्यांना विमा रक्कमेच्या 25 % पैसे अदा करण्याचे आदेश दिले आहेत पण मुजोर विमा कंपन्या या आदेशाचे पालन करत नाहीत उलट 72 तासात नुकसानग्रस्त पिकाची माहिती देण्याच बंधन घातले आहेत, तर सॅटेलाईट सर्व्हे आणि जॉईंट कमिटी स्थापन करु असे सांगितले आहे,  यावर औसा येथील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणात विमा कंपनी आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आल्याचे आमदार पवार यांनी सांगितले असून विमा कंपन्या मुजोर तर शासन कमजोर झाल्याचा आरोप केला आहे, आता विम्याची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार हे नक्कीच

मोठी कारवाई ; ATSने एकाला ताब्यात घेतलं,  जान मोहम्मदचा हँडलर असण्याची शक्यता
मुंबई : मुंबई (ATS)च्या टीम नागपाड़ा ने एक संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाही नंतर मुंबई च्या टीम ने त्यातील ७ व्या संशयित आरोपी ला ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत त्याला एकाला ताब्यात घेण्यात आलं.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com