माझ्यासमोर येऊन बोला! भावना गवळींचे किरिट सोमय्यांना आव्हान 

वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा नितीन गडकरीजींच्या पत्राद्वारे उघड झाला आहे.
  Kirit Somaiya, Bhavana Gawli .jpg
Kirit Somaiya, Bhavana Gawli .jpg

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेच्या वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawli) यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप केला आहे. तसेच भावना गवळी यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या एका तक्रारीवरुन सोमय्या यांनी सवाल उपस्थित केला होता. त्यावर भावना गवळी यांनी किरिट सोमय्या यांना उत्तर दिले आहे. (Bhavana Gawli's reply to Kirit Somaiya) 

भावना गवळी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या, किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, एकेकाळी ते ही आमचे सहकारी होते. मात्र, त्यांनी माझ्या समोर येऊन बसून, सांगावे कोणता भ्रष्टचार झाला. कशामध्ये झाला तेव्हा त्यांना मी उत्तरे देईन, असे गवळी म्हणाल्या आहेत. 

किरिट सोमय्या काय म्हणाले होते? 

किरिट सोमय्या यांनी ट्वीट करत गवळी यांच्यावर आरोप केले होते. त्यामध्ये ते म्हणाले की ''वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा नितीन गडकरीजींच्या पत्राद्वारे उघड झाला आहे. वाशिम शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या रु.100 कोटींच्या घोटाळ्या विरोधात न्यालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी मी शुक्रवार 20 ऑगस्टला वाशिम येथे भेट देणार आहे.'' असे सोमय्या यांनी म्हटले होते.

तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले ''खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता ₹7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलिस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून?'', असा सवाल समोय्या यांनी उपस्थित केला आहे.  

दरम्यान, महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे करीत असलेल्या ठेकेदारांना शिवसेनेचे काही पदाधिकारी धमकावत आहेत आणि काम बंद करण्यास सांगत आहेत. सुरू असलेली कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यात आल्यास महाराष्ट्राचे व जनतेचे नुकसान होईल. आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. 

गडकरी यांच्या पत्रानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष करून वाशिम लोकसभा मतदार संघाचा या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. या मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. वाशिम जिल्ह्यातील 90 टक्के नॅशनल हायवे चे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात मी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात मला कुठलाही विचारणा झाली नाही. नॅशनल हायवेचा विषय असल्यामुळे मी गडकरी यांना भेटून सगळ्या गोष्टी सांगणार, असल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात गडकरी पत्रात म्हणतात, राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गांचे काम करताना अडचणी येत आहेत. तसेच काही ठिकाणचे स्थानिक नेते या कामात अडथळा आणत आहेत. त्यांनी हे पत्र २७ जुलैला लिहिले असून अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबद्दल लिहिले आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com