निष्काम कर्मयोगी : लोकमान्य टिळक 

गेल्या शतकभरात देशाचे रुप किती पालटले आहे... लोकमान्यांसारखे तत्त्वज्ञानी-नेते व स्वामी विवेकानंदासारखे कंगाल संन्यासी कोठे आहेत? सर्व धर्मादाय दवाखाने व शाळा कोठे गेल्या आहेत?
43tilak_7_0.jpg
43tilak_7_0.jpg

भारतासारख्या देशासाठी शंभर वर्षे हा खरेतर खूप मोठा कालावधी आहे. लोकमान्य टिळक यांनी लोकांना ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच,’ ही हाक दिली तेव्हा, त्यांनी भारतीयांना स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्यास सांगितले होते. हा विचार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘स्वतःचे राज्य’, म्हणजे अस्तित्वात असलेल्या सरकारी संस्थांमध्ये काम करणे किंवा महात्मा गांधींच्या ‘अहिंसा चळवळी’पेक्षा वेगळा होता. लोकमान्यांच्या तल्लख बुद्धीला पंजाब व बंगाल या मुस्लिमबहुल प्रातांचा उपयोग करून देशभरात काही मुस्लिम नेते उदयास येत असल्याचे १९०६ मध्येच लक्षात आले होते. त्यांनी १९१६ मध्ये मुस्लिम लिगच्या नेत्यांना कॉंग्रेसच्या चळवळीत सहभागी होऊन ‘भारतीय स्वायत्तते’ची मागणी करावी, असा आग्रह धरला. त्यावेळी मोहमंद अली जिना यांच्यावर लोकमान्यांचे संपूर्ण नियंत्रण होते.

भारत ‘स्वार्थ राज’ असलेला देश 
लोकमान्यांचे १ ऑगस्ट १९२०ला निधन झाल्यानंतर गांधीजींनी गोखलेंच्या ‘स्वतःच्या राज्या’च्या संकल्पनेचा स्वीकार केला व जिना त्यांच्या द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेच्या मार्गाने गेले व परिणामी शेवटी देशाची फाळणी झाली. जगाच्या इतिहासात कोणत्याही देशाला एवढ्या वाईट पद्धतीने स्वातंत्र्य मिळाले नसेल. हे स्वातंत्र्य बेघर न झालेल्या व आपल्या प्रियजनांपासून दूर न झालेल्यांपुरतेच मर्यादित होते. फाळणीने दोन कोटी नागरिकांना त्यांच्या मूळ निवासापासून उखडून फेकले आणि हे सर्व भुकेकंगाल विस्थापीत झाले. आपल्याला एक कायमचा शत्रू मिळाला व समाज ‘स्वराज्य’ या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध विभागला गेला. आपल्या तत्कालीन नेत्यांनी सोव्हिएत युनियनची केंद्रीय पद्धतीने नियंत्रण करणारी अर्थव्यवस्था असलेले मॉडेल स्वीकारले, मात्र ती राबविण्यासाठीचे पुरेसे अधिकार त्यांच्याकडे नव्हते. अत्यंत ढिसाळ सरकारी कारभारामुळे सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला व भारत ‘स्वार्थ राज’ असलेला देश बनला.
या ‘स्वार्थ राज’मध्ये राजकीय पक्ष हे कुटुंबाचे व्यवसाय बनले. 

‘स्वराज्य’ नसून ‘स्वार्थ राज’ 
बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्यांनी भारताची मोठी बाजारपेठ ताब्यात घेतली, त्यामुळे स्थानिक व्यवसाय मारले गेले. हे सर्व प्रकारची राजकीय वैचारिकता असलेल्या पक्षांकडून झाले. देशाच्या घटनेत अजूनही ‘समाजवादाचा’ पुरस्कार करणारा आपला देश रोजगारातील असमानतेच्या निर्देशांकाचा विचार करता अगदी तळाला आहे. देशात एकुण राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) प्रत्येकी एक ट्रिलिअन डॉलरमागे असलेल्या अब्जाधीशांची संख्या जगात रशियानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना सोन्याचा भाव तोळ्यामागे ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे व अर्थव्यवस्थेची वाढ खुंटून तीचा संकोच होत असताना शेअर बाजार रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. प्रत्येक महिन्याला अब्जाधीशांच्या यादीतील भारतीयांची संख्या वाढतच चालली आहे. हे लोकमान्यांना अपेक्षित ‘स्वराज्य’ नसून, त्याचे भ्रष्टरुप ‘स्वार्थ राज’ आहे.

देश माध्यमांकडून चालवला जातो
सध्या देश माध्यमांकडून चालवला जातो आणि त्याची मालकी उद्योजकांच्या हातात आहे. प्रत्येक भारतीयासाठी इंटरनेट उपलब्ध आहे, मात्र त्यातून केवळ हुकमाची ताबेदार असलेली व एकाच उत्पादनाच्या वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची निवड करणारी स्वार्थी पिढी जन्माला आली आहे. (इंटनेटच्या माध्यमातून खरेतर सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकऱ्या व भुकेल्यांसाठी भाकरीची सोय होणे अपेक्षित होते.) कोरोना विषाणूमुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात हजारो स्थलांतरीत उजाड हमरस्ते आणि रेल्वेच्या ट्रॅकवरून उपाशीपोटी चालत आपल्या घराकडे निघाल्याचे दृश्य सर्वत्र दिसत होते. ही घटना अजूनही विचारशक्ती शाबूत असलेल्यांसाठी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची, समाजवादी राष्ट्राची घोर थट्टा व भारताच्या इतिहासातील सर्वांत भीषण कालखंड होता.

स्वामी विवेकानंदांची भेट
लोकमान्य टिळक व स्वामी विवेकानंद यांची १९८२ मध्ये मुबई-पुणे प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये भेट झाली होती. लोकमान्यांनी या संन्याशाला आपल्या घरी राहण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले व स्वामीजी लोकमान्यांच्या घरी दहा दिवस राहिले. लोकमान्य आपल्या आठवणींमध्ये लिहितात, ‘स्वामीजींनी लोकांमध्ये मिसळणे टाळले. त्यांच्या खिशात एक छदामही नव्हता... स्वामींचा माझ्याप्रमाणेच असा विश्वास होता की, श्रीमद् भगवत गीता केवळ संन्यस्त राहण्याचा उपदेश करीत नाही, तर प्रत्येकाला अनासक्त राहण्याचा व फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याच संदेश देते.’


देशाचे रुप पालटले 
गेल्या शतकभरात देशाचे रुप किती पालटले आहे... लोकमान्यांसारखे तत्त्वज्ञानी-नेते व स्वामी विवेकानंदासारखे कंगाल संन्यासी कोठे आहेत? सर्व धर्मादाय दवाखाने व शाळा कोठे गेल्या आहेत? आपल्या सर्व वैज्ञानिक संस्था कोरोना विषाणूबद्दल तर्कसंगत विधान करण्यात अयशस्वी का होत आहेत, आपल्या नेत्यांना लॉकडाउनचेही राजकारण केले आहे का, फेक न्यूज संदर्भातील नियमावली आम्हा कोणालाच धक्कादायक का वाटत नाही, प्रत्येकच क्षेत्रात स्वतःवर विश्वास नसलेल्यांची व नकारात्मक विचार करण्यांची फौज का आहे? लोकमान्य आज पुन्हा जिवंत झाले आणि म्हणाले, ‘जो स्वराज्यावर विश्वास ठेवतात, तेच खरे भारतीय. त्यांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या किंवा ते कितीही हालाखीचे जीवन जगत असले, तरी त्यांचा देशावरचा विश्वास थोडाही कमी होणार नाही,’ तर माझा त्या प्रसंगावर पूर्ण विश्वास बसेल. भारत जगातील सर्वांत मोठा दूध, डाळी व मसाल्यांचा उत्पादक देश आहे, म्हशींची संख्या जगात सर्वाधिक आहे, त्याचबरोबर गहू, तांदूळ व कपाशीचे लागवडीखालचे सर्वाधिक क्षेत्र असलेला देश आहे. तांदूळ, गहू, कपाशी, ऊस, मत्स्यशेती, शेळी व मेंढीचे मांस, फळे, भाजीपाला व चहाचा यांचा जगातील दुसरा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. मात्र, शेतकरी गरीबीत जगतात आणि पीक न आल्यास आत्महत्या करतात. मात्र, मी नकारात्मक विचार करणारा किंवा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नसलेली व्यक्ती नाही. देशाचे पंतप्रधान भारत २०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करेल तेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर देण्याचे ध्येय निश्चित करतात, तेव्हा मी त्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. हे प्रत्येक भारतीयाला आतापर्यंत नाकारले गेलेले व लोकमान्यांना अपेक्षित असलेले ‘स्वराज्य’ असेल...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com