शिवसेना स्वबळावर लढली असती तर शंभर जागा जिंकल्या असत्या, संजय राऊतांचा फडणविसांना टोला 

 शिवसेना स्वबळावर लढली असती तर शंभर जागा जिंकल्या असत्या, संजय राऊतांचा फडणविसांना टोला 

पुणे : आता कोणी कोणासाठी दरवाजे उघडे ठेवून बसू नये. आता एकत्र येण्याची वेळ निघून गेली आहे असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

फडणवीस यांनी काल एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेशी पुन्हा युती होऊ शकते. आमचा शिवसेना जुना मित्र आहे असे म्हटले आहे. याचा समाचार राऊत यांनी घेतला आहे. आपल्या नेहमीच्याच शैलीत त्यांनी फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केले. 

राऊत म्हणाले, की जर शिवसेना स्वबळावर लढली असती तर आम्हीही शंभर जागा जिंकल्या असत्या, पण, आज जर तरची भाषा करण्याला काही अर्थ नाही.फडणवीस हे विरोधीपक्षनेते आहेत. ते त्यांचे काम करीत आहेत. महाराष्ट्राला आतापर्यंत अनेक उत्तर विरोधीपक्षनेते लाभले आहे. आता फडणवीसही विरोधीपक्षनेतेपदाचे उत्तम काम करतील अशी मला आशा आहे. 

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनीही शिवसेना-भाजपचे सरकार पुन्हा येऊ शकते असे विधान केले असता ते म्हणाले, की मला माहित नाही ते काय बोलले आहेत. जे बाळासाहेबांचा फोटा लावून महाराष्ट्रात वाढले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून शिवसेनेने फायदा उचलला हे बोलू नये. शिवसेना-भाजप युतीबाबत आता आम्हाला काहीही बोलायचे नाही आता वेळ निघून गेली आहे. त्यामुळे कोणी कोणासाठी दरवाजे उघडे ठेवू नयेत.'' 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com