औरंगाबाद : देशावर ,राज्यावर आणि शहरावर कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे, अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांना दोन घास मिळावे यासाठी सामाजिक संस्था, राजकीय संघटना झटत आहेत .मात्र अशावेळीही काही व्यापारी धान्यांचे भाव वाढवून नफेखोरी करू पाहत आहेेत. ही वेळ पैसे कमावण्याची नाही तर आपल्या जवळचा पैसा खर्च करून गरिबांना मदत करण्याची आहे असा सणसणीत टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून इम्तियाज जलील घरी बसूनच जनजागृती आणि गोरगरिबांना अन्नधान्य व इतर मदत पोहोचवत आहेत. गरिबांसाठी अन्नधान्य खरेदी करताना आलेला अनुभव त्यांनी सांगितला.
इम्तियाज जलील म्हणाले, गरिबांसाठी धान्य खरेदी करताना मोंढ्यातील काही व्यापारी भाव वाढले आहे असे सांगून जास्त पैसे उकळत आहेत, अशा नफेखोरी करू पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो,परिस्थिती काय आहे आणि आपण वागतो कसे याचे भान राखले पाहिजे? आज अनेक लोक ज्यांचे पोट हातावर आहे अशा गरजूंना पदरमोड करून मदतीसाठी पुढे येत आहेत .
कोरोनाचे संकट मोठे आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी .या काळात आपण केलेली मदतच कायम लक्षात राहील. पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडले आहे अशी कानउघाडणी देखील इम्तियाज जलील त्यांनी केली
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.