जे अडकले तेच राष्ट्रवादीतून सटकले !

arun_gujrathi
arun_gujrathi

जळगाव : ' कुछ तो मजबूरी होगी, ऐसे  कोई बेवफा नही होता...'असा शेर सांगून विधानसभेचे माजी सभापती अरूणभाई गुजराथी म्हणाले, साखर कारखाना, बेहिशेबी मालमत्ता यात जे अडकले ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर सटकले आहेत. बाकी सर्व राष्ट्रवादीत राहिले आहेत.

जे गेले आहेत. यात आमची हार नाही, अन भाजपचीही जीत नाही. मात्र आता आहे, त्या कार्यकर्त्यांच्या बळावर राष्ट्रवादी कॉंग्रेस जोमाने लढून यश मिळविणार आहे.

जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेश निरिक्षक करण खलाटे उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना अरूणभाई गुजराथी म्हणाले, राज्यात अनेक नेते शरद पवारांना सोडून गेले आहेत. जाणारे नेते म्हणतात आमच्या हदयात शरद पवार आहेत, मग तुम्ही सोडून जाताच कशाला? विकासासाठी आम्ही पक्ष सोडून जात आहोत, असे ते सांगत आहे. पण कुणाच्या विकासासाठी? केवळ स्वार्थासाठीच ते पक्षबदल करीत आहेत.

 पक्षबदल केलेल्या एकालाही भाजप मंत्रीपद देणार नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले. गेले ते गेले कार्यकर्त्यांनी आता जोमाने कार्य करण्याची गरज आहे. त्यातून पक्षाची ताकद वाढवून विधानसभेत निश्‍चित यश मिळणार आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यातून सर्वात जास्त सहा आमदार निवडून आणणार आहोत. असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com