शिवसेनेने आधी जनतेला कौल घ्यावा आणि मग वल्गना कराव्यात : थोपटे

शिवसेनेने आधी जनतेला कौल घ्यावा आणि मग वल्गना कराव्यात : थोपटे

खेड-शिवापूर : "भोर विधानसभेला कोणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवणार आहे. त्यामुळे आधी जनतेचा कौल घ्या आणि मग भोरची जागा जिंकण्याची वल्गना करा," असा टोला आमदार संग्राम थोपटे यांनी शिवसेनेला लगावला. 

शिवगंगा खोऱ्यातील विविध गावातील विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन आमदार थोपटे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

घोटावडे फाटा (ता.मुळशी) येथे सोमवारी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीची गुलामगिरी मोडून काढून भोरचा पुढील आमदार शिवसेनेचा करा, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले होते. या पार्श्वभूमीवर थोपटे यांना विचारले असता थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

थोपटे म्हणाले, "भोरच्या जागेवर कोणाला निवडून द्यायचे हे पक्षाचे पदाधिकारी ठरवणार नसून  जनता ठरवणार आहे. त्यामुळे शिवसेनेने अगोदर जनतेचा कौल घ्यावा आणि मग भोरची जागा जिंकण्याची वल्गना करावी" 

दरम्यान विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उदघाटनाच्या माध्यमातून थोपटे हे मतदार संघ पिंजून काढत आहेत. भोर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, दिलीप बाठे, मारुती गुजर आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com