ठाण्याचे आयुक्त नगरसेवकांना चोर ठरवताहेत: महापौर शिंदे

ठाण्याचे आयुक्त नगरसेवकांना चोर ठरवताहेत: महापौर शिंदे

ठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वाद आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

महापौरांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आयुक्तांना सर्वसाधारण सभेत आपल्या अधिकाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे; तर नगरसेवक चोर असल्याचा समज आयुक्तांकडून पसरवला जात असल्याचा थेट आरोप महापौरांनी केला आहे. 

"सभागृहात एखादा नगरसेवक अथवा नगरसेविकेने विकास प्रश्न विचारल्यास त्यांच्याबाबत मानहानीकारक भाषेचा वापर करून त्यांचा अवमान केला जातो; तसेच एखाद्या नगरसेवकाने ठाण्यातील विकासकासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यास आयुक्त भर सभागृहात नगरसेवकांना उलट-सुलट प्रश्न विचारतात. वैयक्तिकरीत्या नगरसेवकांची चौकशी करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो.

 तसेच अन्य अधिकाऱ्यांना घेऊन सभागृहाबाहेर पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अनेक वेळा आयुक्त पालिकेत उपस्थित असतानाही सर्वसाधारण सभेस उपस्थित राहत नाहीत. आयुक्तांकडून नगरसेवक चोर असल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न सातत्याने होत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. 

नागरिकांच्या हिताचे प्रस्ताव सभागृहात आल्यास अनुपस्थित राहणे आणि केवळ विकासकांसंदर्भात आलेल्या प्रश्नांबाबत सभागृहात उपस्थित राहणे, हे आयुक्तांना योग्य वाटते का? असा सवाल महापौरांनी विचारला आहे.

आयुक्तांच्या या कार्यशैलीमुळे ठाणे शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत असून अनेक विकासकामे खोळंबली आहे. प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे जनतेच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com