कल्याण- डोंबिवली पालिकेला 100 कोटी - उद्धव ठाकरे

पहिल्या टप्प्यात येथील कारखान्यांची घातक, कमी घातक तसेच अन्य प्रकारात वर्गवारी केली जाईल. या कारखान्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे तपासणी केली जाईल. मंडळाने सुचवलेल्या सुरक्षा यंत्रणांची अंमलबजावणी या कारखान्यांना करणे अनिवार्य असेल; अन्यथा कारखान्यांना कुलूप लावले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यात कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन दुरुस्त केली जाईल. तिसऱ्या टप्प्यात नागरी वस्तीला कारखान्यांमुळे होणारा प्रदूषणाचा त्रास दूर करण्यासाठी हे कारखाने अन्यत्र स्थलांतरित करण्यात येतील.
 कल्याण- डोंबिवली पालिकेला 100 कोटी - उद्धव ठाकरे

कल्याण : कल्याण- डोंबिवली शहरात आश्वासन दिल्यानुसार काही प्रकल्प सुरू झाले आहेत त्यांना निधीची गरज आहे. या प्रकल्पांची तपासणी करून आवश्‍यकतेनुसार हा निधी त्यांना उपलब्ध करून दिला जाईल. येथील नागरिकांना आपण चांगल्या शहरात राहत असल्याचा अभिमान वाटावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कल्याण-डोंबिवली शहरातील रस्ते त्यांची प्राथमिकता तपासून तयार केले जावेत. त्यांची साफसफाई करावी, तसेच सुशोभीकरणही करावे यासाठी मुख्यमंत्री म्हणून या शहरात प्रथमच येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपये जाहीर केले. या पैशांचा वापर कसा होतो कामे कोणत्या पद्धतीने केली जातात हे पाहिले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

या परिसरातील रासायनिक पदार्थांमुळे गुलाबी झालेल्या रस्त्याच्या पाहण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले होते. त्यानंतर त्यांनी कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांच्या दालनात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत वरील आदेश दिले आहेत. यावेळी राज्याचे पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे उपस्थित होते. 
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या रासायनिक कारखान्यांमुळे होत असलेले प्रदूषण दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठोस उपाययोजनांची घोषणा केली आहे. येथील कारखान्यांना तसेच निवासी वस्तीला योग्य न्याय मिळेल अशा पद्धतीने तीन टप्प्यात ही योजना राबवली जाणार आहे. रासायनिक कारखान्यांमुळे प्रदूषण होत असल्याने या कारखाने अन्यत्र स्थलांतरित केले जाणार आहेत. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत तर त्यांना कुलूप लावले जाईल असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 
प्रदुषणावर ठोस उपाययोजना 
डोंबिवलीमध्ये विविधरंगी पाऊस, गुलाबी रस्ते अशा जगावेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी तसेच त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी आपण या परिसराचा दौरा केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रदूषण हा या भागातील मुख्य मुद्दा असून त्यावर ठोस कारवाई किंबहुना कार्यवाही आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. तीन टप्प्यात ही कार्यवाही केली जाणार आहे.

 पहिल्या टप्प्यात येथील कारखान्यांची घातक, कमी घातक तसेच अन्य प्रकारात वर्गवारी केली जाईल. या कारखान्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे तपासणी केली जाईल. मंडळाने सुचवलेल्या सुरक्षा यंत्रणांची अंमलबजावणी या कारखान्यांना करणे अनिवार्य असेल; अन्यथा कारखान्यांना कुलूप लावले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यात कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन दुरुस्त केली जाईल. तिसऱ्या टप्प्यात नागरी वस्तीला कारखान्यांमुळे होणारा प्रदूषणाचा त्रास दूर करण्यासाठी हे कारखाने अन्यत्र स्थलांतरित करण्यात येतील. 
भंगार गाड्यांबाबत धोरण 
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली सारख्या अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर बेवारस भंगार गाड्या उभ्या असतात. या गाड्या शहराचे विद्रुपीकरण करतात. यातील काही गाड्या जप्त केलेल्या असतात. या गाड्या शहराबाहेर नेण्यासाठी योग्य ते धोरण आखले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com