किशनचंद तनवाणी शिवसेनेत जाण्याच्या चर्चेने खळबळ

 किशनचंद तनवाणी शिवसेनेत जाण्याच्या चर्चेने खळबळ

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी काल दिवसभर चर्चा होती. मुंबईला ते मातोश्रीवर भेटायला गेल्याची चर्चा काल सुरू झाली. शिवसेनेकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्यचे तिकीट न मिळाल्यामुळे ते भाजपमध्ये गेले. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवलेले तनवाणी राज्यपातळीवरील पूर्वाश्रमीच्या काही शिवसेना नेत्याप्रमाणे पुन्हा स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

त्या निवडणुकीत नंतर भाजपने तनवानी यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी शहरात भाजपची ताकद वाढविली. वाळुज येथे गुरुवारी (ता.29) केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, यामध्ये औरंगाबाद मध्यसाठी किशनचंद तनवाणी यांनी मुलाखत दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दिवशी तनवाणी मुंबईला मातोश्रीवर गेल्याची चर्चा शहरात सुरू झाली. मात्र मुंबईला वैयक्तिक कामासाठी गेलो असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी सांगितले 
माझ्याबद्दलची चर्चा चुकीची - तनवाणी 
मी मुंबईला असल्याचे स्वतःच स्टेटस टाकले. मला अनेकांचे फोन आले की तुम्ही मातोश्रीवर जात आहे काय म्हणून, मी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश सभा घेतली. काल इच्छुक म्हणून मुलाखतही दिली. मग मी मातोश्रीवर कसं जाणार. मुंबईला मी माझ्या खाजगी कामासाठी आलो आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी कुठे जाणार नाही. मी मातोश्रीला जाणार नाही असे किशनचंद तनवाणी यांनी सरकारनामाशी बोलताना स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com