पीठाची गिरणी चालविणेही अवघड ,पण मी पाच साखर कारखाने उभारले :  तानाजी सावंत

..
TanajiSawant
TanajiSawant

परंडा :  "जे बोलतो ते करतोच', म्हणत पहिल्या टप्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सीना-कोळेगांव प्रकल्पात आणणारच असा विश्‍वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.तालुक्‍यातील डोणजा येथे आयोजित प्रचारसभेत डॉ. सावंत बोलत होते.

माझे डोंणजा गावावर विशेष प्रेम असल्याचे सांगतानाच आलेश्वरचा नदीवरील पूल आवश्‍यक असून आगामी काळात पालकमंत्री होऊन त्याचे उद्‌घाटन मीच करणार असेही सावंत यांनी यावेळी सांगितले. सावंत म्हणाले, शिवसेनेत 30 आमदारांचे काम उपनेता म्हणून मी पाहतो आहे. पीठाची गिरणी चालविणेही अवघड असते. मात्र मी नऊ वर्षांत पाच साखर कारखान्यांची उभारणी केली.

माझ्याकडे नियोजन आहे, विकासाची दिशा आहे. आपल्या मतदारसंघात दोन साखर कारखाने व्यवस्थित सुरु असून, अनेकांना रोजगार देत परिसर विकसित केला. परिसरातील कोणत्याच शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक ठेवणार नाही. महायुतीच्या परंडा येथील बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी ऊसाबाबत अडचण सांगितली. त्यांचे जागेवरच निरसन केले.

भैरवनाथ साखर कारखान्यात अडचणी येणार नसल्याचे सांगत मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील अकरा धरणं वॉटर ग्रीडने जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांवत म्हणाले. नदीजोड प्रकल्प, नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. मंत्री झाल्यावर एक वर्ष दोन महिन्यांत पहिल्या टप्प्यातील पाच टीएमसी पाणी कोळगावात आणणारच याचा पुनरुच्चार देखील डॉ. सांवत यांनी शेवटी केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com