पुणे : "सरकारने नेहमी जनतेचा हुंकार ऐकला पाहिजे. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नसल्याचा माझा गेल्या तीन महिन्यांचा अनुभव आहे. कारण मी तीन महिन्यांपूर्वीच मंत्री झालो आहे. सध्या सरकारमध्ये माझी अवस्था सिंहासन चित्रपटातील निळू फुले यांच्यासारखी झाली " ,असल्याचे स्पष्ट करत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी (ता.11) सरकारला घरचा आहेर दिला.
शिवाय त्यांच्या या वक्तव्याने मंत्रिमंडळात त्यांची कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुळात मी राजकारणी नाही. त्यामुळे मी कोणाला घाबरतही नाही. जे खरे आहे, ते रोखठोक सांगणे, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळेच मी जिथे जाईल, तिथे
माझ्या बोलण्याची ब्रेकिंग न्यूज होते, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील यशदामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमा मध्ये ते बोलत होते.
सावंत म्हणाले, " मुळात मी राजकारणी नाही. फक्त पावणेतीन वर्षांचा मी राजकारणी आहे. कारण पावणेतीन वर्षांपूर्वी राजकारणात आलो आणि एवढ्या अल्पशा कालावधीत आमदार, मंत्री आणि पालकमंत्रीही झालो."
"माझा पिंडच राजकारणी नसल्यानेच मी सरकारमध्ये असो नसो, नेहमीच रोखठोक बोलत असतो. सध्या मंत्रिपदाचा तीन महिन्यांचा अनुभव असला तरी, येत्या विधानसभा निवडणुकी नंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमध्येही मी कॅबिनेट मंत्री असणार आहे आणि पुन्हा जलसंधारण खातेच माझ्याकडे कायम राहणार आहे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.