तिसरा सर्जिकल स्ट्राईक मतदार विरोधकांवर करतील - सुषमा स्वराज

तिसरा सर्जिकल स्ट्राईक मतदार विरोधकांवर करतील - सुषमा स्वराज

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश सुरक्षित आहे, मतदार पुन्हा मोदी यांना निवडतील असा विश्‍वास व्यक्त करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की आता तिसरा सर्जिकल स्ट्राईक मतदारच विरोधकांवर करतील. मोदी सरकारने गेल्या पावणेपाच वर्षात "सबका साथ सबका विकास ' या मंत्रानुसार काम केले आहे. 

मुंबईत आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवडणूक आयोगाची आज दुपारी 5 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या मध्ये निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होईल. त्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या आमच्या सरकारची ही शेवटची सभा तर आगामी सरकारच्या प्रचाराची ही पहिली सभा ठरेल. पाकिस्तानविरोधात मोदी सरकारने उचलेलेल्या कठोर पावलांचा उल्लेख करून आपल्या सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची ठोस बाजू मांडत त्यांनी विरोधक घेत असलेल्या शंकाबद्दल कडक टीका केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com