सरकार कोणाचेही येऊ द्या, मंत्री आमचेच असतील!  

नवीन तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही, परंतु लोकांचेही मत जाणुन घेतले पाहिजे.
सरकार कोणाचेही येऊ द्या, मंत्री आमचेच असतील!  

नगर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार येईल. जरी दुसरे आले तरी आमच्या पक्षातून तिकडे गेलेल्यांपैकी बरेच मंत्री असतील, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

पुढील पंधरा दिवस महाराष्‍ट्रातील 15 शहरात खासदार सुळे लोकांशी संवाद साधणार आहेत. त्या निमित्ताने आज त्या नगरमध्ये आल्या होत्या. त्यांनी व्यापारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. 

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या सरकारच्या वेळी वैयक्तिक कटुता नव्हती. आता मात्र वैयक्तिक कटुता घेऊन कारवाईचा बडगा दाखवला जात आहे. सध्या सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नोटाबंदी नंतरही भ्रष्टाचार कमी झालेला नाही, हे त्यांच्याच मंत्र्यांनी केलेले वक्तव्ये आहे. कारवाईच्या नावाखाली नेत्यांचा आवाज दाबला जात आहे. ईव्हीएमबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. नवीन तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही, परंतु लोकांचेही मत जाणुन घेतले पाहिजे. आपण मत कोणाला दिले आणि ते कोणाला मिळाले, याची खातरजमा करण्याचा अधिकार मतदारांना असलाच पाहिजे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com