पाचही जिल्हा परीषदांच्या निवडणुका महिन्याभरात घ्या : सर्वोच्च न्यायालय 

..
nagpur_zp_
nagpur_zp_

नागपूर : राज्यातील पाचही बरखास्त करण्यात आलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका एका महिन्याच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले. 50 टक्के आरक्षणाचा विषय निकाली काढूनच या निवडणुका घ्याव्या असे आदेश आहेत.

 परंतु, महिन्याभरात आरक्षणाचा मुद्दा निकाली काढून निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करून निवडणुका घेणे शक्‍य आहे का, यावर आज नागपूर जिल्हा परिषदेत चर्चा रंगली होती. 

जिल्हा परिषदेतील आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर असल्याने याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. हा मुद्दा निकाली काढण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. त्यासाठी राज्य सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधेयकसुद्धा मांडले. 

मात्र हे विधेयक पारित होऊ शकले नाही. या विधेयकात आवश्‍यक त्या दुरुस्त्या प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. कायद्यात दुरुस्तीसाठी विशेष अधिवेशन बोलवावे लागेल किंवा अध्यादेशाच्या माध्यमातून ते लागू करावे लागणार आहे. मात्र ही प्रक्रिया करून त्यानंतर महिन्याभरात निवडणुका घेणे सोपी नसल्याची चर्चा आज जिल्हा परिषदेत होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com