ही केवळ 'राष्ट्रवादी'ची वल्गना आहे : सुजय विखे

ही केवळ 'राष्ट्रवादी'ची वल्गना आहे : सुजय विखे

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, मतदारसंघात नारळ वाढविलेले एकही काम खोटे नाही.

अमरापूर (नगर) : "मुळा धरणाचे हक्काचे पाणी बीडला जाणार, ही केवळ 'राष्ट्रवादी'ची वल्गना आहे. सरकार व लोकप्रतिनिधी आपला असताना, असा निर्णय कधीच होऊ देणार नाही आणि झालाच तर सर्वांत आधी आपण जलसमाधी घेऊ,'' असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ ढोरजळगाव येथे मतदारांशी संवाद साधताना विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, "केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि राज्यातही भाजपचे सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांतील नेत्यांची उठाठेव केवळ स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी चालली आहे. या मतदारसंघात भले भले मागे ठेवून, साडेचार वर्षे झोपेत असलेल्यांना उमेदवारी देत "राष्ट्रवादी'ने वेळ मारून नेण्याचे काम केले. ढोरा नदीवरील बंधारे मुळा धरणाच्या पाण्याने भरले आहेत. मात्र, "राष्ट्रवादी'चे लोक पाणी पाणी करीत लोकांची दिशाभूल करीत आहेत. गेली साडेचार वर्षे ते झोपेत असल्याने, खाली पाणी शिरून त्यांची झोपमोड झाली आहे.''

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, "मतदारसंघात नारळ वाढविलेले एकही काम खोटे नाही. मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यांवर विरोधी उमेदवारांना बोलताच येत नाही. त्यामुळे जातीचे भांडवल करून ते निवडणुकीत अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com