राहुरी (नगर) : "आमदार शिवाजी कर्डिले त्यांच्या भाषणात माझे नाव विसरतात. आजही विसरले; पण विधानसभेच्या तिकीटवाटपाच्या खिडकीत मी बसलोय, हे त्यांनी विसरू नये,'' असा चिमटा काढून, "तिकीट दिले नाही, तरी उभा राहणार, असे त्यांनी जाहीर केले; पण ती वेळ येणार नाही. त्यांची कामे व जनसंपर्क चांगला आहे. त्यांनाच राहुरीत भाजपची उमेदवारी राहील आणि तेच विजयी होतील,' असा निर्वाळा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या नियोजन बैठकीत डॉ. विखे पाटील बोलत होते. आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, आसाराम ढूस, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, नगराध्यक्ष सत्यजित कदम, चाचा तनपुरे आदी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, "अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांच्यासारखी विखे-कर्डिले जोडी आहे. जिल्ह्यातील घड्याळाचे काटे आम्हाला खिळखिळे करायचे आहेत. बरेच काटे पाडले. जी घड्याळे बंद पडली नाहीत, त्यांच्या बॅटऱ्या काढणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस पूर्वी छोट्या वाहनातून येत. आता बस घेऊन येत असले, तरी ती अगोदरच भरली आहे. त्यात आता जागा शिल्लक नाही.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.