भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी सुलतानी संकट : आमदार तांबे

भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी सुलतानी संकट : आमदार तांबे

नगर : शेतकऱ्यांचे सध्या जे हाल सुरू आहेत. त्याला भारतीय जनता पक्षाचे चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत. शेतमालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे भाजप सरकार हे शेतकऱ्यांवरील सुलतानी संकट आहे, अशी टीका नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. 

संगमनेर कृती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यानी सरकारवर सडकून टीका केली. संगमनेर तालुक्‍यात कॉंग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीला मोठा लौकिक प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बाजारसमितीने कायम प्रयत्न केले. शेतकरी उभा राहण्यासाठी कॉग्रेस प्रयत्न करीत असताना भाजप सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. सरकारचे धोरण सहकार मोडणार आहे अशी टीका त्यांनी केली. 

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांना आशेला लावले. प्रत्यक्षात अनेक निकष लावून कर्जमाफी टाळण्याचा प्रयत्न केला. स्वस्त धान्य दुकानातील धान्य कमी करून गोरगरीबांची चेष्टा सुरू आहे. कांदा आयात केला. डाळिंबावर निर्बंध लादले अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगणार. संघटित नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. सर्वात बुरे दिन असलेले हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट आहे, असेही श्री. तांबे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com