शहाणे लोक राजकारणात का येत नाही हे आज उलगडले : सेबीच्या नोटिशीवर सुभाष देशमुखांचा उद्वेग 

'लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनी' बंद झालेली नाही अथवा कुठेही पळून गेलेली नाही. 'सेबी' ने देशभरात खाती गोठवण्याबाबत माहिती कळवायची गरजच नव्हती. याबाबत मीच केंद्रीय वित्त मंत्र्यांकडेच चौकशीबाबत कळवणार आहे. लोकमंगल शेतकऱ्यांचे भागभांडवल देण्यास आजही कटीबध्द आहे. उद्योग व्यवसायातील शहाणे लोक राजकारणात का येत नाहीत याची कारणे आज मला उलगडली आहेत, असा उद्वेग सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शहाणे लोक राजकारणात का येत नाही हे आज उलगडले : सेबीच्या नोटिशीवर सुभाष देशमुखांचा उद्वेग 

सांगली : 'लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनी' बंद झालेली नाही अथवा कुठेही पळून गेलेली नाही. 'सेबी' ने देशभरात खाती गोठवण्याबाबत माहिती कळवायची गरजच नव्हती. याबाबत मीच केंद्रीय वित्त मंत्र्यांकडेच चौकशीबाबत कळवणार आहे. लोकमंगल शेतकऱ्यांचे भागभांडवल देण्यास आजही कटीबध्द आहे. उद्योग व्यवसायातील शहाणे लोक राजकारणात का येत नाहीत याची कारणे आज मला उलगडली आहेत, असा उद्वेग सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले देशमुख आज जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी सांगलीत आले होते. कालच मंत्री देशमुख यांच्या लोकमंगल अँग्रो इंडस्टीज कंपनीची सर्व खाती गोवठण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. याबाबत ते म्हणाले, "लोकमंगलवर सेबीने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. मी व्यवसायात असताना सहकारी साखर कारखानदारी उभारण्यासाठी भांडवल उभारणीसाठी रक्कम गोळा केली. तत्कालीन नियमानुसार सहकारी साखर कारखान्यांच्या अटीमुळे मी खासगी कारखाना उभारला. त्यांची कंपनी कायद्याखाली नोंदणी केली. सात-आठ हजार शेतकऱ्यांकडून भांडवल गोळा केले मात्र, कंपनी कायद्यानुसार जास्तीत जास्त 50 शेतकऱ्यांकडूनच भांडवल जमा करावे, असा नियम आहे. त्यानुसार सेबीने जुलै 2018 मध्ये भागभांडवल परत करण्याची नोटीस दिली. त्यानंतर नियमानुसार देश, राज्य आणि जिल्हास्तरावरील दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिध्द करुन शेतकऱ्यांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ती आजही सुरुच आहे."

"तरीही सेबीच्या रिकव्हरी विभागाने नोटीस दिली आहे. कंपनी बंद नाही, पळून गेलेली नसताना देशभरातील बॅंक खाती गोठावण्याचा प्रकार अनभिज्ञ आहे. याबाबत मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कळवणार आहे." असे सांगून ते म्हणाले, ''व्यवसायातील चांगले लोक राजकारणात काय येत नाहीत, हे मला कळू लागले आहे. व्यवसाय करीत असताना काही त्रूटी राहिलेल्या असतात. त्यात मी राजकारणात आल्यामुळे त्रास होतोय. राजकारणात आल्यापासून दहा संस्था बंद केल्या. लोकमंगलचा मी संस्थापक असल्याने रक्कम परत देण्याची नैतिक जबाबदारी माझीच आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com