सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण

सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण

मुंबई :उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची भूसंपादन अधिसूचना रद्द केल्याची घोषणा खोटी होती हे सिद्ध झाले आहे. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षाची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेचे नेते वारंवार खोटे बोलून लोकांची दिशाभूल करित आहेत.24 एप्रिल 2018 रोजी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करित आहे असे देसाई नाणारमधील जाहीर सभेत म्हणाले होते. मात्र अद्याप अधिसूचना रद्द झाली नाही. 

एक अधिसूचना रद्द करायला एवढा वेळ लागतो का? उध्दव ठाकरे यांनीही वारंवार नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अशा घोषणा केल्या मात्र शिवसेनेच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

शिवसेना कोकणवासियांचे नाही तर स्वतःचे हित पाहात आहे. नाणारला विरोध आहे असे दाखवून शिवसेना भाजपशी सौदेबाजी करित आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौ-यात यांचा सौदा बहुतेक ठरला आहे असे दिसते कदाचित त्यामुळेच शिवसेनेचा नाणारला असणारा विरोध मावळलेला दिसत आहे, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेला लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com