औरंगाबादवर मुंबईचाच वॉच, पालकमंत्रिपद सुभाष देसाईंकडे 

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले बंड आणि त्यावरून खैरे सत्तार दानवे यांच्यात निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून होती. सुभाष देसाई यांच्या नियुक्तीनंतर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे
Subhash Desai Appointed as Aurangabad Guardian Minister
Subhash Desai Appointed as Aurangabad Guardian Minister

औरंगाबाद :राज्यातील नव्या पालकमंत्र्यांची घोषणा आज करण्यात आली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वप्रथम बंडखोरीची लागण झालेल्या औरंगाबादवर आता खास मुंबईचाच वॉच राहणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रि पद शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले बंड आणि त्यावरून खैरे सत्तार दानवे यांच्यात निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून होती. सुभाष देसाई यांच्या नियुक्तीनंतर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहरावर मुंबईचे लक्ष कायम असावे यासाठी देसाई यांची नियुक्ती केल्याचे बोलले जाते. यापूर्वी देखील रामदास कदम,  एकनाथ शिंदे या मुंबईच्या नेत्यांचीच औरंगाबादच्या पालकमंत्रिपद नियुक्ती करण्यात आली होती.

यावेळी औरंगाबाद जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळाल्यामुळे पालकमंत्रीपद देखील मिळेल अशी अपेक्षा होती. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकत्व सोपवले जाईल असे बोलले जात होते. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्रीपद देत त्यांची नाराजी दूर केली जाईल, अशी देखील शक्यता वर्तवली जात होती.

परंतु, या दोन्ही शक्यता दूर सारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू व ज्येष्ठ सहकारी सुभाष देसाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवत एक प्रकारे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर अंकुश ठेवला आहे. औरंगाबाद हे शहर औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून मराठवाड्याची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे स्थानिक जिल्ह्यातील मंत्र्याकडे पालकमंत्र्यांची जबाबदारी न देता उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांच्या हातात सूत्रे सोपवली आहेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते असल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांवर त्यांचा वचक निर्माण होऊन पक्षांतर्गत वाद आणि कुरघोडीचे राजकारण याला देखील चाप लावण्याचा प्रयत्न देसाई यांच्या नियुक्तीतून करण्यात आल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com