पाणी प्रश्‍नी बैठकीस दांडी मारणाऱ्या आमदारांना बांगड्या पाठवणार : विद्यार्थी संघटनांचा आक्रोश

आमदार प्रशांत बंब यांच्यातर्फे हॉटेल ऍम्बेसेंडर येथे सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदार,खासदार तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले होते.
पाणी प्रश्‍नी बैठकीस दांडी मारणाऱ्या आमदारांना बांगड्या पाठवणार : विद्यार्थी संघटनांचा आक्रोश

औरंगाबाद : मराठवाड्‌यातील पाणी प्रश्‍नासंदर्भात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीच्या बैठकीत मराठवाड्‌यातील 55 पैकी केवळ 11 आमदार होते. मराठवाड्‌यातील लोकप्रतिनिधीना दुष्काळ, पाणी प्रश्‍नाविषयी गांभीर्य नाही, यामुळे बैठकीस दांडी मारणाऱ्या आमदारांना पोस्टाने बांगड्या पाठवणार असल्याचे बैठकीस आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. मराठवाड्‌यावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात या विद्यार्थ्यांनी बैठकीतील आमदारसमोर संताप व्यक्‍त केला. 

आमदार प्रशांत बंब यांच्यातर्फे हॉटेल ऍम्बेसेंडर येथे सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदार,खासदार तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले होते. या बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सूजितसिंह ठाकूर,नारायण कुचे, मेघना बोर्डीकर, अभिमन्यू पवार, राजेश पवार, राम पाटील रातोळीकर, संतोष दानवे, प्रशांत बंब आणि शिवसेनेचे संजय सिरसाट एवढे आमदार व औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिना शेळके यांनी या बैठकीस हजेरी लावली. उर्वरित राष्ट्रवादी, कॉंग्रेस तसेच इतर पक्षातील आमदार खासदारांनी दांडी मारली. यामूळे बैठकीतील लोकप्रतिनिधीनी नाराजी व्यक्‍त केली. याच बैठकीत आलेल्या विद्यार्थ्यांनी या आमदाराविरोधात संताप व्यक्‍त करीत हे आमदार पाणीप्रश्‍नी अनुपस्थितीत राहिल्याबद्दल संताप व्यक्‍त केला. 

विद्यार्थी म्हणाले, पाणी प्रश्‍न महत्वाचा आहे. आमदार आपल्या पगारवाढीच्या वेळी एकत्र येतात. स्वार्थांसाठी एकत्र येतात. फक्‍त मराठवाड्याच्या विकासाठी एकत्र का येत नाहीत, असे सांगत अनुपस्थिती असलेल्या आमदारांना बागड्या पाठविणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी घेतली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयानी राग व्यक्‍त केला. एवढेच नव्हे तर या आमदारांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या बांगड्या पाठविणार असल्याचे सांगण्यात आले. 

वॉटर ग्रीड रद्द करू नका 
वॉटर ग्रीड प्रकल्पामूळे मराठवाड्‌यातील पाणी प्रश्‍न सुटणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ही योजना रद्द होणार असल्याची बातम्या प्रसार माध्यमात आल्यामुळे मराठवाड्‌यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुले आणि सदस्य थेट बैठकीच्या ठिकाणी धडकले. बैठकीच्या ठिकाणी जाऊ शकले नाही. आत्महत्याग्रस्तांसाठी काम करणाऱ्यां शामसुंदर कनके यांनी औरंगाबादेत समर्थ विद्यामंदिरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या बैठकीत हजेरी लावत वॉटर ग्रीड योजना रद्द करू नका अशी मागणी केली. बैठकीस आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी मुलांच्या भेटी घेत समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वॉटरग्रीड रद्द करू नका अशी मागणी केली. यासाठी सर्व आमदारांनी ही मागणी सरकारकडे मांडा अशी विनंती केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com