राज्याच्या अर्थसंकल्पात कल्याणकारी योजनांचा वर्षाव

राज्याच्या अर्थसंकल्पात कल्याणकारी योजनांचा वर्षाव

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युती सकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर करून विविध कल्याणकारी योजनांचा वर्षाव करत समाजातील सर्व घटकांना खुष करण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य असेल असे सांगत त्यांनी विविध कल्याणकारी योजनांची यादीच जाहीर केली. धनगर समाजासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून त्यासाठी 1 हजार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे उभारली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

2019-20 या वर्षात शेततळ्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून 25 हजार शेततळी उभारण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी 46 अन्नप्रक्रिया उद्योग उभे करण्यात येणार असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देत असल्याचे त्यांनी सांगितले. सूतगिरण्यांना भांडवल देण्यासाठी 45 कोटींची तरतूद करणयत आली आहे. राज्य परिवहन मंडळाला नवीन बसेस खरेदी करण्यासाठी 160 कोटी देण्यता येणार आहेत. महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त राबवण्यात ेयणाऱ्या विविध उपक्रमांसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधवा आणि घटस्फोटीत महिलांना उद्योग उभारण्यासाठी सरकारने 200 कोटीची तरतूद केली आहे. अहिल्याबाई होळकर स्मती संग्रहालय उभारण्याचेही सरकारने जाहीर केले. राज्यात रस्तेबांधणीसाठी भरीव अशी तीन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com