एसटीवर दिवाळखोरीचे सावट : भाई जगताप

एसटीवर दिवाळखोरीचे सावट : भाई जगताप

मुंबई : एसटी महामंडळातील योजनांचा बोजवारा उडाला असून, वारेमाप खर्च दिवाळखोरीत ढकलला जात आहे. त्यामुळे दोन महिने कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लागली असून, निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके थकली आहेत. या परिस्थितीत कामगारांनी बंड केल्यास जबाबदार कोण, असा सवाल कामगारनेते आमदार भाई जगताप यांनी केला आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी कुलाबा येथे झाली; त्यावेळी आमदार भाई जगताप बोलत होते. या बैठकीत एसटी महामंडळातील 1200 कर्मचाऱ्यांनी कॉंग्रेसप्रणीत एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेत प्रवेश केला. 

एसटीची नवीन शिस्त व आवेदन पद्धती लाखो कर्मचाऱ्यांना वेठीस धरणारी आहे. त्यातच चांगल्या योजनांची अधिकारी आणि कंत्राटदारांनी वासलात लावली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ सुमारे 5000 कोटी रुपये तोट्यात असल्याचा आरोप जगताप यांनी केला. 

एसटी महामंडळापुढे उत्पन्नवाढीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, प्रवाशांच्या संख्येतील वाढीसाठी प्रयोग करणे गरजेचे आहे. महामंडळाने उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव करणेही आवश्‍यक आहे, असे आमदार जगताप म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com