राष्ट्रपती राजवटीची धमकी हा महाजनादेशाचा अपमान : संजय राऊत

''राष्ट्रपती राजवटीचा धमकी हा महाजनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणी व्यक्ती नाही. ते देशाचे एक स्तंभ आहेत. राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालू नका. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही, त्यांचा मान ठेवा. अशाप्रकारचं वक्तव्य करणे अत्यंत चुकीचं आहे,'' अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतच्या भाजपच्या वक्तव्यावर टिका केली आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई : ''राष्ट्रपती राजवटीचा धमकी हा महाजनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणी व्यक्ती नाही. ते देशाचे एक स्तंभ आहेत. राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालू नका. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही, त्यांचा मान ठेवा. अशाप्रकारचं वक्तव्य करणे अत्यंत चुकीचं आहे,'' अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतच्या भाजपच्या वक्तव्यावर टिका केली आहे. 

आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”, असं मोठं विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे, त्याचा समाचार राऊत यांनी घेतला. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, "राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत. संसदीय लोकशाहीचे नियम आणि पेच आम्हालाही कळतात, तेव्हा राष्ट्रपती राजवटीची भाषा का होते?  राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाचा अपमान करु नये. राष्ट्रपती व्यक्ती नाही देशाचा मुख्य स्तंभ आहे.''

ते पुढे म्हणाले, ''सत्ता स्थापनेला विलंब होणे हे काही नवीन नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नये, तुमचे सर्व कारस्थान अपयशी ठरल्यामुळे ते अशी भाषा करत आहेत, हे नवनिर्वाचित आमदारांना घाबरवण्यासाठी आहे का, मराठी माणूस याला घाबरत नाही.'' महाराष्ट्राची स्थिती पाहता,सर्वच पक्ष एकमेकांशी चर्चा करत आहेत, फक्त शिवसेना आणि भाजप वगळता. मुहूर्त काढून सत्ता होत असेल तर मला आनंद आहे, पण सत्ता स्थापनेचा मुहूर्त असायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांची सत्ता स्थापन होईल, त्याला कुणीही रोखू शकत नाही. शरद पवारांची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे. चर्चा सुरु झाली होती, हे चुकीचं आहे, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या संधीपर्यंत युतीधर्म पाळणार आहोत. आम्हाला ईडीची भीती दाखवून काहीही अर्थ नाही, असे प्रयोग अयशस्वी होतील. ईडीची भीती बंद, आता राष्ट्रपतीची भीती दाखवणार, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.

सरकार स्थापन करण्यास विलंब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कुणी जर सरकार स्थापन करणार असेल तर त्याने 145 चा आकडा दाखवावा. बहुमताचा मुहूर्त महत्वाचा आहे. कुणीही जर 145 ची यादी घेऊन जाणार असेल तर त्यांचं सरकार स्थापन होईल, असं संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com