...तर शिवसेनेला केवळ 9 जागा 

...तर शिवसेनेला केवळ 9 जागा 

मुंबईः भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास जेमतेम 9 लोकसभा मतदारसंघात जिंकता येईल , अशी फिती असल्याने युतीबाबत फेर विचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीयरित्या समजते. सेनेशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले तर ते कठीण असेल असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी कबूल केले. 

 नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणांविरोधात तयार होत असलेल्या संयुक्त आघाडीत शिवसेनेला जागा मिळणे शक्‍य नसल्याने युतीतील साहचर्याचाच फेर विचार व्हावा, असे मत काही मवाळ पंथीय नेत्यांनी मांडले आहे. मोदी यांच्या विरोधात नाराजीची लाट आली तरी शिवसेनेला काही जागा जिंकायच्या असतील तर, भाजपशिवाय पर्याय नसल्याचे या गटाचे म्हणणे आहे.

पालघर पोट निवडणुकीत जबरदस्त शक्ती प्रदर्शन करताना शिवसेनेने तडाखेबंद मत घेतली. मात्र तरीही भाजपचा विजय झाला. या प्रचारादरम्यान भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याची हाक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीत शिवसेनेला स्थान देणे शक्‍य नाही, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनुसंघवी यांनी मुंबईत स्पष्ट केले याकडे सेनेतील भाजप वादी गटाने पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून दिल्याचे समजते. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार हे उघड आहे. भाजपने सातत्याने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करीत वेगळे लढायचे ठरले तर परस्परांची मते कापली जातील. त्यामुळे भाजपचे नुकसान होणार असले तरी शिवसेनेची खासदार संख्या जेमतेम 9 वर येते आहे, अशी आकडेवारीही पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला विरोध करताना, युतीतून बाहेर पडणे कितपत फायद्याचे ठरेल, असा प्रश्‍न ही पुढे आला आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही आकडेवारी सादर केल्यानंतर मात्र सेनेतील महत्त्वाच्या नेत्यांनी आपला निर्णय मान्य असेल, असेही स्पष्ट केले आहे. या पुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवली जाईल असे शिवसेनेने अगोदरच स्पष्ट केले आहे. अशी प्रतिक्रिया यासंबंधि विचारणा केली असता प्रवकत्यांनी दिली. 

शिवसेनेचे रागरंग पाहता भाजप मात्र सध्या हवालदील झाली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध उत्तम असले तरी सध्या सेना ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. काही दिवसांनी संवाद सुरू होईल, अशी अपेक्षाही भाजपमध्ये व्यक्त केली जाते आहे. मात्र सेनेशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले तर ते कठीण असेल असे एका ज्येष्ठ नेत्यांनी कबूल केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com