शेतकऱ्यांचे अनुदान कर्जात वळते करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाई करा - धडक मोर्चात शिवसेनेची मागणी

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली. गुलमंडी, सिटीचौक, शहागंज, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा विभागीय आयुक्‍तालयावर दाखल झाला. विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
शेतकऱ्यांचे अनुदान कर्जात वळते करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाई करा - धडक मोर्चात शिवसेनेची मागणी

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानापोटी जमा होणारी रक्कम बॅंकेचे अधिकारी परस्पर कर्ज खात्यात वळती करून घेत आहेत, तर काही शेतकऱ्यांची खातीच गोठवण्यात आली आहेत अशा बॅंक अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी ही मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने आज जिल्ह्यात धडक मोर्चा काढला. शहरात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात आज प्रत्येक तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली. गुलमंडी, सिटीचौक, शहागंज, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा विभागीय आयुक्‍तालयावर दाखल झाला. विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. 
आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यात सत्तापेच सुरू असला तरी शिवसेना जनता आणि शेतकऱ्यांशी बांधील आहे. सत्ता कुणाचीही येवो आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी भांडत राहणार, रस्त्यावर उतरणार असे आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

या मागण्यासाठी मोर्चा 
- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे नियमाप्रमाणे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास त्यांना विमा कंपन्यांनी 25 टक्‍के नुकसानभरपाई आगाऊ देणे बंधनकारक आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. 
- शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी पिक विमा कंपन्यांनी जिल्हा व तालूकास्तरीय वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. 
- नुकसान झालेल्या पिकांना हेक्‍टरी 8 हजार तर फळबागांना हेक्‍टरी 18 हजार नुकसान भरपाई अतिशय कमी असून यामध्ये वाढ करण्यात यावी 
- काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा व अन्य स्वरुपांचे अनुदान जमा झाले असले तरी, अनेकांच्या खात्यातुन बॅंकांनी परस्पर रक्‍कम कर्ज खात्यावर वळवुन घेतली आहे. काही बॅंकांनी शेतकऱ्यांचे खाते गोठवले असून ही अतिशय गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांचे खाते गोठवू नये, त्याचप्रमाणे असे खाते गोठवणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. 
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमुक्‍तीच्या आजपर्यंत 18 ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र अजूनही याविषयी हजारो शेतकऱ्यांना माहिती नाही. यामध्ये नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा समावेश असून प्रशासनाने गावपातळीवर जाऊन या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. 
-सध्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे बॅंकांमार्फत करण्यात येत असलेली सक्‍तीची कर्जवसुली थांबवण्यात यावी. 
- शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप सुरु करावे 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com