शिवसेनेतर्फे  भुमरे, सत्तार, राठोड, शंभूराजे, भुसे, गडाख, बच्चू कडू यांना मंत्रीपद 

शिवसेना दर दोन वर्षांनी सेना मंत्री बदलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . बृहन्न मुंबई बाहेर१० जणांना संधी देताना ग्रामीण भागाला प्राधान्य देण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे.
abdul sattar.
abdul sattar.

मुंबई : शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मुंबई बाहेरील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे . 

शिवसेनेतर्फे सातत्याने निवडून येणाऱ्या  आमदारांना संधी देण्यात येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण मतदारसंघातून सांदिपान भुमरे हे  पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत .  ते विहामांडवा येथील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत . 

अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत . ते विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते होते. उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात . 

गुलाबराव पाटिल  जळगाव ग्रामीण मधून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . ते माजी मंत्री आहेत . 

संजय राठोड, दिग्रस- यवतमाळ जिल्हा  येथून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . ते माजी राज्य मंत्री आहेत . 

उदय सामंत  रत्नागिरी मधून २००४ पासून सलग  चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . 

दादा भुसे यांचीही आमदारकीची ही चौथी टर्म आहे . ते मलेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आलेले आहेत . ते माजी राज्यमंत्री आहेत . 

शंभुराज देसाई  हे सातारा जिल्ह्यातील पाटण मधून सलग चौथ्यांदा आमदार म्ह्णून निवडून आलेले आहेत .  

भाजपमध्ये निघालेले पण ऐनवेळी तिकिटासाठी शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार (सिल्लोड, औरंगाबाद जिल्हा ) यांना मंत्री पदाची लॉटरी लागली असून ते सिल्लोड मधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . सत्तार यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे दोनदा आमदार म्हणून निवडून आलेलं आहे आणि ते राज्यमंत्रीही राहिलेले आहेत .  शिवसेनेचा मुस्लिम चेहरा  म्हणून त्यांचा राज्यात प्रभाव वाढणार आहे . 

दोन सहयोगी आमदारांना मंत्रीपद देण्याचा  निर्णय शिवसेनेने घेतला आहे .   

क्रांतिकारी शेतकरी  पक्षाचे शंकरराव गडाख (नेवासा, नगर जिल्हा  ) आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू  हे सलग चौथव्यांदा अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत   

मुंबईतून स्वत: उद्धव ठाकरे , एकनाथ शिंदे आणि   सुभाष देसाई असल्याने आता अनिल परब सोडून अन्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी  आहे. 

शिवसेना दर दोन वर्षांनी सेना मंत्री बदलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . बृहन्न मुंबई बाहेर  १० जणांना संधी देताना ग्रामीण भागाला प्राधान्य   देण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com