मुंबई : ''काल नऊ वाजेपर्यंत हे महाशय आमच्या बरोबर होते. चर्चेत सक्रीय होते. सूचनाही केल्या. अचानक गायब झाले. बाॅडी लँग्वेजचा संशय आला होता. जी व्यक्ती पाप करायला जाते, त्याची नजर बोलकी असते. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे" अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाबाबत व्यक्त केली आहे.
काल रात्री अजित पवारांचा फोन बंद होता, ते वकिलांकडे बसल्याचे सांगितले जात होते. ते कोणत्या वकिलांकडे बसले होते, हे आज सकाळी समजले. भाजपने पुन्हा राजभवनाचा दुरूपयोग केला आहे. सत्ता, पैसा आणि मस्ती याचा वापर करत त्यांनी सत्ता स्थापन केली. आम्ही शरद पवारांना भेटणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. या सगळ्या घडामोडींशी शरद पवार यांचा संबंध नाही, असेही राऊत म्हणाले. त्यांनी जे पाप केले आहे, त्यातून महाराष्ट्राची जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हा धोका शिवसेनेला दिलेला नाही, महाराष्ट्राला दिलेला आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादी मधून फुटल्याचे संकेत दिले आहेत. तसे ट्वीट त्यांनी केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.