मुंबई : भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसल्यानेच त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला नसल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केले. जर भाजपला सत्ता स्थापन करता येत नसले तर शिवसेनेकडे आणखीही काही पर्याय आहेत, असा इशारा त्यांनी दिला. १४५ आमदारांचा पाठिंबा देऊन भाजपने खुशाल सरकार स्थापन करावे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, "अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदालाच मतदारांनी जनादेश दिलेला आहे. ठरल्याप्रमाणे करा...या मंत्राला हा जनादेश आहे. शिवसेना कुठल्याही आशेवर जगत नाही. शिवसेनेची भूमीका बदलेली नाही. भाजपमुळे राज्यात अस्थिरता निर्माण होते आहे. राज्याचे नेतृत्त्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल," शिवसेनेने कुठल्याही आमदाराला सुरक्षित स्थळी ठेवलेले नाही, असाही दावा त्यांनी केला. साम - दाम- दंड भेदाची भाषा शिवसेनेला चालत नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
"आजच्या बैठकीत सगळ्या आमदारांनी भूमिका मांडली. मुख्यमंत्री शिवसेनेनचा व्हावा, असे या आमदारांनी ठामपणे सांगितले. सगळे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मागे आहे. जर फडणवीस शिवसैनिक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद द्यावं असं ते म्हणत असतील तर मग त्यांनी शिवसेनेचाच करावा. सत्तेसाठी हव्यास का धरावा,'' असेही ते म्हणाले. जर सरकार स्थापन होत नसेल तर द्या लष्कराकडे, आम्हाला चालेल, असेही वक्तव्य राऊत यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.