सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे आहे. शिवजयंती राज्यात तसेच देशात मोठ्याप्रमाणात साजरी झाली पाहिजे. मात्र, तारखांचा वाद निर्माण झाला आहे. यातून छत्रपतींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. सगळ्यांनी एक तारीख निश्चित करून त्याच दिवशी भव्य दिव्य अशी शिवजयंती उत्सव देशभर साजरा करायला हवा, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध तारखांना साजरी केली जाते. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज घराण्याचे वंशज म्हणून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी संवाद साधण्यात आला. ते म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण मानतात. प्रत्येक जाती, धर्माचे लोकांमध्ये शिवाजी महाराजांविषयी आदराची भावना आहे. मात्र, जयंतीच्या तारखेच्या वादामुळे त्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. असे होऊ न देता शासनाने 19 फेब्रुवारी जयंतीची तारिख जाहीर केली आहे. मात्र, काही शिवप्रेमींना ही तारिख मान्य नाही. त्यामुळे या जयंती तारखेचा वाद मिटवून एकच तारिख सर्वांच्या मतानुसार निश्चित करावी, असे शिवप्रेमी किंवा छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील व्यक्ती म्हणून मला वाटते. याबाबत निर्णय शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे''
ते पुढे म्हणाले, ''त्यासाठी शिवप्रेमी आणि सर्व जनतेचा विचार करून सगळ्यांचा विचार घेऊन कुठेतरी एका तारखेवर एकमत झाले पाहिजे. त्या तारखेला सर्वांनी मान्यता दिली पाहिजे. शिवभक्तांनी एक तारिख निश्चित करून त्याच दिवशी राज्य तसेच देशभर एकच शिवजयंती भव्य दिव्य अशी साजरी झाली पाहिजे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.