राहुरी (नगर) : "रासपचे अध्यक्ष महादेव जानकर त्यागी व नि:स्वार्थी नेतृत्व आहे. मंत्रिमंडळातील त्यांचे काम उत्तम होते. त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत. धनगर समाजाला भाजपच न्याय मिळवून देऊ शकतो, याची त्यांना खात्री आहे,'' असे प्रतिपादन भाजपचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
रासप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कर्डिले बोलत होते. ते म्हणाले, "अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानाची स्थापना धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झाली; परंतु प्रतिष्ठानाचा राजकीय वापर केला जात आहे. प्रतिष्ठानातर्फे काहींनी दुकानदारी मांडली. धनगर समाज कोणाच्या पाठीशी आहे, हे निवडणुकीनंतर समजेल. धनगर समाजाचे नेते राम शिंदे यांच्याविरुद्ध जिल्ह्याबाहेरचा उमेदवार उभा करणाऱ्या "राष्ट्रवादी'विरुद्ध धनगर समाज एकत्र येईल.''
"राहुरी तालुक्यातील सहकारी संस्था तनपुरे यांनी बंद पाडल्या. मी त्या बंद संस्थांची कुलपे उघडण्याचे काम केले. तालुक्यात सभामंडप, पथदिवे, रस्त्यांची कामे मार्गी लावली. वैयक्तिक कामे करताना पक्षभेद, गट-तट विसरून काम करण्याची माझी पद्धत आहे. मला मध्यस्थाची गरज नसते. जनतेच्या मनात स्थान निर्माण केल्याने, मला राहुरी तालुक्यात एक लाख मताधिक्य मिळेल. विरोधी उमेदवाराचे "डिपॉझिट' जप्त होईल,'' असे कर्डिले म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.